शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ई-बसमधून देताहेत ई-लर्निंगचे धडे

By admin | Updated: May 26, 2014 02:41 IST

माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव -  माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे हेच माहिती-तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे ही निकड ओळखून संजीवनी फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ‘ई-बस’ ही नवी संकल्पना घेऊनत्यांनी संगणक विद्यार्थ्यांच्या दारातच नेऊन ठेवले आहे, तेही मोफत. आतापर्यंत १७ शाळांमधील १३०० विद्यार्थी संगणक साक्षर झाले आहे़ ‘संजीवनी तंत्रज्ञान आपल्या दारी, चला करू या मैत्री तंत्रज्ञानाशी’ हे ब्रिद घेऊन सहा महिन्यांपूर्वी संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या संकल्पनेतून ई-बसचा जन्म झाला़ वीस लॅपटॉप, प्रोजेक्टर, इंटरनेट कनेक्शन असा कॉम्प्युटर लॅबसारखा सेटअप असलेली ‘संजीवनी ई-बस’ सज्ज झाली़ प्रा़ वैभव परजणे यांच्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याची जबाबदारी टाकण्यात आली़ आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बेसिक कॉम्प्युटर आॅपरेशन, वर्ड, पॉवर पॉइंट, हार्डवेअरची माहिती, ई-मेल अकाउंट तयार करणे, इंटरनेटवर एखाद्या विषयाची माहिती उपलब्ध करून घेणे याबाबतची माहिती ‘संजीवनी ई-बस’च्या माध्यमातून दिली जाते़ आजवर कोपरगाव तालुक्यातील १७ शाळांमधील १३०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले तेही मोफत़ पाठ्यपुस्तकाशिवाय संगणकाचे ज्ञान मिळाल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक खूश आहेत़ इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी हा विषय आहे़ परंतु ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणक उपलब्ध नाहीत़ त्यामुळे ‘संजीवनी ई-बस’चा फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे़