शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडावर दुष्काळाचे ढग

By admin | Updated: July 4, 2014 06:10 IST

वरूण राजा रूसल्याने पश्चिम वऱ्हाडावर दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. एकेकाळी कपाशी हे मुख्य पीक असलेला हा भाग गत काही वर्षात सोयाबीनकडे वळला

राजेश शेगोकार, बुलडाणा
वरूण राजा रूसल्याने पश्चिम वऱ्हाडावर दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. एकेकाळी कपाशी हे मुख्य पीक असलेला हा भाग गत काही वर्षात सोयाबीनकडे वळला; मात्र यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने खरिपाच्या प्रारंभापासूनच शेतकऱ्यांसाठी संकटांची मालिका सुरू झाली होती. पावसाने त्यामध्ये आणखी भर पाडली आहे.
अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये १६ लाख ३१ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले; मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे संपूर्ण नियोजनच कोलमडले आहे. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले असून, आर्द्रार् नक्षत्रही कोरडेच जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मूग, उडीद या दोन्ही पिकांचा पेरा करण्याची वेळ निघून गेली आहे. आता हा पेरा स्वतंत्रपणे होणारच नाही. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातून यावेळी उडीद व मूग ही दोन पिके जवळपास बाद झाल्यातच जमा आहेत. आता सूर्यफुलासारखे आपात्कालीन पीक घेऊनच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे.
अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यांमध्ये धूळ पेरणी करण्याचे प्रमाण बरेच आहे. यावर्षी अकोल्यात ६ हजार ८००, तर बुलडाण्यात ७ हजार ७०० हेक्टरवर झालेल्या धूळ पेरण्या उलटण्याच्या स्थितीत आहेत. केवळ पाण्याची सोय असलेले शेतकरीच पेरण्या जिवंत ठेवू शकले.
२०१० ते २०१३ या चार वर्षांच्या पाऊस परिस्थितीवर नजर टाकली, तर पश्चिम वऱ्हाडात पहिला पाऊस साधारणत: ५ ते १५ जूनदरम्यान येऊन, खरीप हंगामाच्या पेरणीला सुरूवात होते, असे चित्र दिसते; परंतु यावर्षी अद्यापपर्यंत पाऊसच झालेला नाही.
सरासरी ७०० ते ७५० मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या पश्चिम वऱ्हाडात यावर्षी अद्याप दोन अंकी आकडाही गाठला गेलेला नाही. गतवर्षी ३० जूनपर्यंत नदी-नाले ओसंडून वाहत होते, धरणंही भरली होती. यावर्षी मात्र ते कोरडेठण्ण आहेत. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचे संकटही उभे ठाकण्याची चिन्हं दिसत आहेत.
सद्यस्थितीत महिनाभर पुरेल इतका जलसाठा पश्चिम वऱ्हाडात आहे. बुलडाण्यात गतवर्षी गाळ काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्यामुळे सध्या जलसाठ्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे; मात्र हे पाणी जिल्हावासियांना जास्तीत जास्त दीड महिना पुरू शकेल. त्यामुळे वरूणराजाची कृपा लवकर झाली नाही, तर शेतकऱ्यांसोबतच इतर घटकांचेही हाल होणार आहेत.