शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त शेत अन् हताश शेतकरी

By admin | Updated: March 15, 2015 01:15 IST

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाने पुन्हा जोर धरल्याने रब्बी हंगामातील सोंगणीलायक पिके अक्षरश: आडवी झाली

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाने पुन्हा जोर धरल्याने रब्बी हंगामातील सोंगणीलायक पिके अक्षरश: आडवी झाली असून डोळ््यांदेखत उद्धस्त झालेले शेत हताशपणे पाहण्याची वेळ बळीराजावर आली आहे. गारपीट थांबण्याचे नाव घेत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात वीज कोसळून सहा जनावरेही दगावली आहेत.पश्चिम विदर्भातही नुकसान पश्चिम विदर्भात गहू, हरभरा भाजीपाला, फळपिके असे जवळपास ७५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शुक्रवारी रात्री अकोला जिल्ह्यात वादळी पाऊस झाला.पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा पाऊस झाल्याने खरीप पिकांचे उत्पादन घटले होते. रब्बी पिकावर आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता गारपिटीने सतावले आहे. यवतमाळमध्ये १७,४४६, अमरावतीत ७ हजार, अकोल्यात १,८३० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. पण पाऊस सुरू च असल्याने नुकसानीचे आकडे बदलत असल्याचे अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगितले. नगरला बागा आडव्या अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात मागील आठ-दहा दिवसांत सहा तालुक्यातील शंभर गावांना पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात गहू, हरभरा, कांदा या पिकांसह डाळींब, द्राक्ष आणि चिकूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू झाले असून पुढील आठवड्यात अहवाल हाती येईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री वीज पडून पारनेर तालुक्यात पाच शेळ्या व तीन करडे ठार झाली. सांगलीत द्राक्षबागांवर संकट सांगली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने द्राक्षबागांसह रब्बी पिके आडवी झाली. खानापूर तालुक्यात गारपीट झाल्याने द्राक्षबागायतदारांना जबर फटका बसला. सध्या तालुक्यातील ३५ ते ४० टक्के द्राक्षे बाजारपेठेत आली आहेत. उर्वरित ६० टक्के द्राक्ष माल अजूनही शेतात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्पुणे : गेल्या १५ दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घालणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट पुढील दोन दिवसानंतर सरणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. १५, १६ मार्चला पावसाची शक्यता असून १७ मार्चपासून पाऊस गायब होईल आणि आकाश निरभ्र राहील, असा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.खान्देशात हजेरीच्नंदुरबारमधील तळोदा तालुक्यात गारा पडल्या. धुळे येथेही रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. खान्देशात आतापर्यंत दोन वेळा पंचनामे झाले आहे. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अजून झालेले नाहीत, तोच पुन्हा पाऊस कोसळत आहे.युरोपातील द्राक्षनिर्यात ५०० कोटींनी घटणारनाशिक : आॅक्टोेबरपासून अधूनमधून होत असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीला फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यात निम्म्याने घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी युरोपात ९७५ कोटींची द्राक्ष निर्यात झाली होती. यंदा गारपिटीमुळे सुमारे ४५० कोटींच्या आसपास राहणार असल्याने त्यात ५०० कोटींची घट होईल, असे चित्र आहे. मागील वर्षी मुंबई पोर्ट ट्रस्टमधून १० हजार कंटेनरची द्राक्ष निर्यात होऊन त्यापोटी सुमारे १,६०० कोटींचे परकीय चलन मिळाले होते.पुढील १० ते १२ दिवसांत निर्यात २ हजार ५०० कंटेनरच्या घरात जाईल. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ३,५०० कंटेनर निर्यात कमी होईल, असे दिसते. एका कंटेनरमध्ये साधारणपणे १५ मेट्रीक टन द्राक्ष असतात. - अशोक गायकवाड, अध्यक्ष,महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघनिर्यातक्षम द्राक्षांबाबत काही निकष आहेत. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाच्या गुणवत्तेत व दर्जातही काही प्रमाणात फरक पडू शकतो. तसेच स्थानिक बाजारपेठेतही व्यापाऱ्यांकडून पडते भाव मिळू शकतात. - ज्ञानेश्वर बोराडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी