शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यामध्ये डेंग्यूचे थैमान; एका दिवसांत तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 05:44 IST

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण : पुणे, ठाणे, खान्देशातही फैलाव

पुणे : राज्यात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे. मंगळवारी दिवसभरात जळगावात दोन तर लातूरमध्ये एक अशा तिघांचे बळी गेले, तर राज्यात हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापुरानंतर सावरणाऱ्या कोल्हापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याखालोखाल पुणे, ठाणे येथे लागण झाली आहे.महापूरग्रस्त कोल्हापूर विभागात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या १,६३० झाली असून, पुण्यात १३६२, ठाणे विभागात १३०३ रूग्ण आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत ६३९० जणांना डेंग्यूची लागण झाली, तर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

जळगाव शहरात यावर्षी ४५ रुग्ण आढळून आले आहेत. नंदुरबार शहरात २८ रुग्ण असून खासदार डॉ. हिना गावीत यांनाही डेंग्यू झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद शहरात सात बळी गेले १ आॅक्टोबरपासून आतापर्यंत ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

कशामुळे होते पैदास?

डेंग्यूचे डास घरात व आसपासच्या भागात साठवलेल्या स्वच्छ पाण्यात असतात. त्यामुळे महापूर वा दुष्काळ असला तरी पाणी साठवून ठेवण्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होते. ग्रामीण भागाचेही शहरीकरण झाल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढते आहे, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यू