शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

coronavirus: राज्यातील कामगारांचे वेतन संकटात! मार्चमध्ये वेतन न मिळाल्याच्या ३८० तक्रारी  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 5:53 AM

उद्योजकांच्या आर्थिक कोंडीत आता आणखी भर पडली असून, राज्यातील हजारो कामगारांना एप्रिलचे पूर्ण वेतन मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

मुंबई : लॉकडाउनच्या काळात कोणत्याही मजूर आणि कामगाराच्या वेतनात कपात करू नका, असे केंद्र सरकारचे स्पष्ट आदेश असतानाही मार्च महिन्याचे वेतन न मिळाल्याच्या ३८० तक्रारी कामगार विभागाकडे दाखल झाल्या होत्या. उद्योजकांच्या आर्थिक कोंडीत आता आणखी भर पडली असून, राज्यातील हजारो कामगारांना एप्रिलचे पूर्ण वेतन मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात कामगारांच्या तक्रारींचा खच पडेल, अशी शक्यता याच विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून त्या हाताळण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. राज्य सरकारने साथ रोग प्रतिबंधक कायद्याचा आधार घेत तर केंद्रीय गृह विभागाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये लॉकडाउनच्या काळात कामगारांच्या वेतन कपातीवर निर्बंध घातले आहेत. या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना कामगार आयुक्त कार्यालयासह संबंधित विभागांना दिल्या असून त्याबाबतचा अहवालही केंद्र सरकारला सादर करावा लागणार आहे. मात्र, आर्थिक अरिष्टामुळे अनेक उद्योजकांना वेतन देणे शक्य नाही आणि कामगार वेतनाशिवाय जगू शकत नाही, ही विचित्र कोंडी हाताळायची कशी, असा प्रश्न या अधिकाऱ्यांना पडला आहे. वेतन किंवा कामगार कपातीच्या तक्रारी आल्यानंतर हा विभाग हस्तक्षेप करून कामगारांना वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यभरातून ३८० तक्रारी दाखल झाल्या होत्या. नोटीस पाठवल्यानंतर त्यापैकी २८८ उद्योजकांनी कामगारांना वेतन देण्याची तयारी दर्शवली असून काही जणांनी ते अदा केले आहे. उर्वरित ९२ प्रकरणांबाबत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सहआयुक्त रविराज इळवे यांनी दिली. सर्वाधिक १९० तक्रारी कोकण विभागातून आल्या आहेत. वेतनकपातीबाबत वर्धा येथील एका उद्योजकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उर्वरित ठिकाणी सामोपचाराने मार्ग काढला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्षकेंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशाच्या विरोधात पंजाब आणि महाराष्ट्रातील काही उद्योजकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर १५ मे रोजी सुनावणी होणार असून, त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कामगार कामावर नसतील तर त्यांच्या वेतनातील वाहन, आहार भत्ता कापण्याची मुभा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून दिल्याची माहिती हाती आली आहे.तक्रारीनुसार कारवाईकेंद्र आणि राज्य सरकारचे आदेश असले तरी तूर्त कामगार विभागाकडून पाठवल्या जाणाºया नोटिसांमध्ये त्या-त्या कायद्यान्वये कारवाईचा इशारा दिला जात नाही. वेतन प्रधान अधिनियम (१९३६) अन्वये वेतन देणे बंधनकारक असल्याने त्याचा आधार घेतला जात आहे. या अधिनियमानुसार एक हजारांपेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना ७ तारखेपूर्वी तर त्यापेक्षा जास्त कामगार असल्यास १० तारखेपर्यंत वेतन देण्याचे बंधन आहे. या निर्धारित कालावधीत वेतन अदा न केल्याची किंवा त्यात कपात केल्याची तक्रार कामगार किंवा त्यांच्या संघटनेने दाखल केल्यास कामगार आयुक्त कार्यालयामार्फत पुढील कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्थाEmployeeकर्मचारी