शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

coronavirus : सीमाबंदीमुळे इगतपुरी अडकले सहा हजार नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:08 PM

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत त्यामुळे अन्य जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यात अडचणी येत आहेत.

 नाशिक- मुंबई, ठाणे, शहापूर आणि अन्य परिसरातून अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांना इगतपुरी येथे जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे थांबावे लागले आहे. या स्थलांतरितांना येथे थांबवण्यास स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध सुरू केला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत त्यामुळे अन्य जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यात अडचणी येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, शहापूर कसारा यासह अन्य भागात नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील अनेक चाकरमाने आणि कष्टकरी कामासाठी वास्तव्यास  होते. मात्र आता कोरोना मुळे उद्योग आणि व्यवसाय बंद झाल्याने सबधितांना आपल्या मूळ गावी जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या साधनाने आणि बहुतांशी पायपीट करत नागरिक नाशिक जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराशी म्हणजे इगतपुरीत आले आहेत.  मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्यामुळे त्यांना नाशिक मध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांचा सध्या इगतपुरीत मुक्काम आहे. बाहेरून मोठ्या प्रमाणात नागरिक आल्याने इगतपुरीतील नागरिक धास्तावले आहेत. त्यांनी या स्थलांतरितांना हटवण्याची मागणी सुरू केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक