शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

महाजनादेश विरुद्ध पोलखोल; मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काँग्रेस यात्रेतूनच देणार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 2:43 PM

२० ऑगस्टपासून काँग्रेसच्या यात्रेला सुरुवात होणार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री करत असलेले दावे खोडून काढण्यासाठी काँग्रेसकडून पोलखोल यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री त्यांच्या यात्रेदरम्यान अवास्तव आकडेवारीसह खोटे दावे करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांना काँग्रेस २० ऑगस्टपासून पोलखोल यात्रेतून प्रत्युत्तर देईल, असं पटोले म्हणाले. १ ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या मोझरीमधून महाजनादेश यात्रेला सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांची माहिती जनतेला देण्यासाठी भाजपाकडून ही यात्रा काढण्यात आली. मात्र महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री करत असलेले दावे खोटे असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. विरोधकांनी विकासकामांवरुन आपल्यासोबत उघड चर्चा करावी, असं आव्हान फडणवीसांनी दिलं. आम्ही त्यांनी वेळ आणि ठिकाण दिलं. मात्र त्यांनी प्रतिसादच दिला नाही, असा दावा पटोलेंनी केला. २० ऑगस्टला राजीव गांधींची जयंती आहे. तेव्हापासून काँग्रेसच्या पोलखोल यात्रेला सुरुवात होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांची यात्रा ज्या मार्गावरुन गेली, त्याच मार्गावरुन काँग्रेसची यात्रा जाईल. फडणवीसांनी केलेल्या दाव्यांची पोलखोल यात्रेतून करण्यात येईल, अशी माहिती पटोलेंनी दिली. 'गेल्या पाच वर्षांत राज्याचा दुप्पट विकास केल्याचा फडणवीसांचा दावा आहे. तब्बल ८ लाख कोटींची परकीय गुंतवणूक आणल्याचं ते सांगतात. त्यांच्या या दाव्यांमधील फोलपणा आम्ही जनतेसमोर आणू,' असं पटोले म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस