शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 19:14 IST

Maharashtra Municipal Elections 2025: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात आणि परिस्थितीनुसार निवडणुकीनंतर आघाडीबाबत विचार करावा, असा पक्षातील नेत्यांचे सूर असल्याचे म्हटले जात आहे.

Maharashtra Municipal Elections 2025: आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात महायुतीत प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याचा कयास बांधला जात आहे. यातच राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार की, फक्त उद्धव ठाकरेंशी युती करणार, यावरूनही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या घडामोडी सुरू असतानाच काँग्रेसमधून मात्र आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत, असा सूर उमटत असल्याचे बोलले जात आहे. 

ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मेळाव्याला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड आणि लहान मित्रपक्षांचे काही नेते उपस्थित होते, पण काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नव्हता. मराठी-हिंदीच्या वादात न पडण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याचे दिसले. उद्धव-राज भविष्यातही एकत्र आले तर महाविकास आघाडी राहील का आणि त्यात काँग्रेस राहील का, हा विषय आता चर्चिला जात आहे. यातच ग्रामीण आणि निम-शहरी भागांत काँग्रेसने पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वबळावर लढाव्यात. निसटून चाललेला एकेक भाग पुन्हा काबीज करावा, असे काँग्रेसमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे, असे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात

एकेकाळी राज्यात सत्ता असलेली काँग्रेस सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यासह विरोधी महाविकास आघाडीचा एक घटक आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण करत असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचा असे वाटते की, काँग्रेसने दुहेरी दृष्टिकोन स्वीकारण्याचा विचार करावा, प्रथम स्थानिक निवडणुका स्वतंत्रपणे लढून, संघटनात्मक ताकद तपासावी आणि नंतर आवश्यक असल्यास निवडणुकीनंतर आघाडी करण्याचा विचार करावा. परंतु, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. काँग्रेसमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पक्षाने महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढावाव्यात आणि निवडणुकीनंतर आघाडीसाठी चर्चेची दारे खुली करावी, हे मॉडेल मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक यांसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरी केंद्रांसह महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकारले पाहिजे.

आगामी निवडणुका कार्यकर्त्यांना प्रेरित करण्याचे एक साधन

शिवाजीराव मोघे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रेरित करण्याचे एक साधन आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी जास्तीत जास्त जागा लढवाव्यात असे सर्वांनाच वाटते. स्थानिक निवडणुका या केवळ महानगरपालिका, संस्थांच्या निवडणुका नाहीत, तर महाराष्ट्रात पक्षाच्या पुनरागमनासाठी महत्त्वाच्या आहेत, असेही काहींचे मत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्याशी निवडणुकीनंतर आघाडी करण्याची शक्यता नाकारत नाही. परंतु काँग्रेसला प्रथम स्वतःचे गमावलेले स्थान परत मिळवावे लागेल. 

दरम्यान, ग्रामीण आणि निम-शहरी भागात भाजपाच्या वाढत्या प्रभावाबद्दल काँग्रेस नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.  महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका, २४८ नगरपरिषदा, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत.

 

टॅग्स :congressकाँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस