शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:47 IST

Pratap Sarnaik News: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाआधी पोलिसांनी धरपकड केली. पोलिसांच्या याच भूमिकेवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. 

Pratap Sarnaik Latest News: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून या परिसरात पोलिसांनी आंदोलकांविरोधात कारवाई सुरू केली. रात्रभर अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांची कारवाई दादागिरी आणि गुंडगिरी असल्याचे म्हणत प्रताप सरनाईकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वैतागले, असे सरनाईक म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माझी भूमिका मी स्पष्ट केलेलीच आहे. मी आधी मराठी आहे. आमदार आणि मंत्री नंतर... ही माझी भूमिका आहे. हे औटघटकेचं असतं."

मी चितेवर जाईपर्यंत मराठी -प्रताप सरनाईक

"मी म्हणालो आहे की, जन्मापासून ते चितेवर जाण्यापर्यंत मी मराठी राहणार आहे. मराठी असल्याचा मला अभिमान आहे. हिंदू असल्याचा मला जसा अभिमान आहे. तसाच मराठी असल्याचा अभिमान आहे. मी आधीच म्हणालो आहे की, पोलिसांनी चुकीचा निर्णय घेतला आणि ही परिस्थिती ओढवली आहे."

याच मुद्द्यावर पुढे बोलताना सरनाईक म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांकडे सकाळीच तक्रार केली. डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आणि वातावरण प्रदूषित केले. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आज जो प्रकार घडलेला आहे, तो फक्त आणि फक्त पोलिसांच्या चुकीच्या निर्णयामुळे घडलेला आहे."

सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्री सुद्धा वैतागले

मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले. मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री सुद्धा वैतागले होते, पोलिसांच्या भूमिकेबद्दल. राज्य सरकारचा पोलिसांना पाठिंबा होता असे नाही. स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घेतले, ते कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले. मी या शहराचा आमदार आहे. मी मंत्री आहे, माझ्याशी चर्चा करायला हवी होती. गृह खात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. पण, कुणाशीच चर्चा न करता पोलिसांनी हे निर्णय घेतले."

वाचा >>मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं?

"ही काय गुंडगिरी आहे? मोर्चा काढत होते, काढू द्यायचा होता ना? रात्री बेरात्री अविनाश जाधव असू द्या किंवा कुणीही असू द्या. काय धरपकड करायची गरज आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. का म्हणून रात्री धरपकड करून वातावरण कलुषित केलं. पोलिसांचे हे चुकीचे आहे आणि पोलिसांवर कारवाई होणं गरजेचं आहे", अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMira Bhayanderमीरा-भाईंदरmarathiमराठीMNSमनसेPoliceपोलिस