शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:47 IST

Pratap Sarnaik News: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाआधी पोलिसांनी धरपकड केली. पोलिसांच्या याच भूमिकेवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. 

Pratap Sarnaik Latest News: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून या परिसरात पोलिसांनी आंदोलकांविरोधात कारवाई सुरू केली. रात्रभर अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांची कारवाई दादागिरी आणि गुंडगिरी असल्याचे म्हणत प्रताप सरनाईकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वैतागले, असे सरनाईक म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माझी भूमिका मी स्पष्ट केलेलीच आहे. मी आधी मराठी आहे. आमदार आणि मंत्री नंतर... ही माझी भूमिका आहे. हे औटघटकेचं असतं."

मी चितेवर जाईपर्यंत मराठी -प्रताप सरनाईक

"मी म्हणालो आहे की, जन्मापासून ते चितेवर जाण्यापर्यंत मी मराठी राहणार आहे. मराठी असल्याचा मला अभिमान आहे. हिंदू असल्याचा मला जसा अभिमान आहे. तसाच मराठी असल्याचा अभिमान आहे. मी आधीच म्हणालो आहे की, पोलिसांनी चुकीचा निर्णय घेतला आणि ही परिस्थिती ओढवली आहे."

याच मुद्द्यावर पुढे बोलताना सरनाईक म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांकडे सकाळीच तक्रार केली. डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले आणि वातावरण प्रदूषित केले. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आज जो प्रकार घडलेला आहे, तो फक्त आणि फक्त पोलिसांच्या चुकीच्या निर्णयामुळे घडलेला आहे."

सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्री सुद्धा वैतागले

मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले. मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री सुद्धा वैतागले होते, पोलिसांच्या भूमिकेबद्दल. राज्य सरकारचा पोलिसांना पाठिंबा होता असे नाही. स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घेतले, ते कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले. मी या शहराचा आमदार आहे. मी मंत्री आहे, माझ्याशी चर्चा करायला हवी होती. गृह खात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. पण, कुणाशीच चर्चा न करता पोलिसांनी हे निर्णय घेतले."

वाचा >>मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं?

"ही काय गुंडगिरी आहे? मोर्चा काढत होते, काढू द्यायचा होता ना? रात्री बेरात्री अविनाश जाधव असू द्या किंवा कुणीही असू द्या. काय धरपकड करायची गरज आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे. का म्हणून रात्री धरपकड करून वातावरण कलुषित केलं. पोलिसांचे हे चुकीचे आहे आणि पोलिसांवर कारवाई होणं गरजेचं आहे", अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMira Bhayanderमीरा-भाईंदरmarathiमराठीMNSमनसेPoliceपोलिस