शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 09:46 IST

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना महापुरूषांबद्दल एक विधान केले. ज्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. 

Sanjay Gaikwad News: हिंदी सक्तीविरोधात तीव्र पडसाद उमटले. सरकारने हिंदीबद्दलचे निर्णय रद्द केले. याच मुद्द्यावर बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह काही महापुरूषांची नावे घेत असे विधान केले, ज्यावर वादाची ठिणगी पडली आहे. विरोधी पक्षाने यावरून संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, "जगामध्ये शिकायचं असेल, तर सगळ्या भाषा अवगत केल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराजा बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ मा साहेब या सगळ्या अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषेसह ते लोक मूर्ख होते का?", असे विधान संजय गायकवाडांनी केले.  

"यावर वाद करून मताचे राजकारण करणे चुकीचे आहे. मी तर थेट बोललो, अनेक ठिकाणी बोललो. जर पाकिस्तानचा दहशतवाद रोखायचा असेल, तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे", असे ते म्हणाले. 

'दिल्लीची चाकरी आणि सत्तेसाठी लाचार झालेल्यांना...', रोहित पवारांची टीका

संजय गायकवाड यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, " कशाची तुलना कशाशी करावी हे दिल्लीची चाकरी करणाऱ्यांना आणि सत्तेसाठी लाचार झालेल्यांना कधीच कळणार नाही..!"

"ते कळो अथवा ना कळो… पण किमान राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांच्यासह सर्वच महापुरुषांबद्दल बोलताना आब आणि आदर राखायचा असतो, याचं तरी भान या आमदार महाशयांनी ठेवावं", असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केला. 

"बेभान होऊन हे आपल्या दैवतांचा अवमान करत असतील तर अशा बेभानांना भानावर आणण्याचं काम महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं, अन्यथा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही", असे रोहित पवार म्हणाले. 

सत्ताधाऱ्यांची संस्कृती झाली आहे -विजय वडेट्टीवार

संजय गायकवाड यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका केली. "छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांना मूर्ख म्हणतात, कशासाठी तर हिंदी भाषेच्या सक्तीसाठी. सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आपण कशासाठी कोणाचे उदाहरण देतो, भाषा काय वापरतो. महापुरुषांचा अवमान करणं ही सत्ताधाऱ्यांची अधिकृत संस्कृती झाली आहे ? या सत्ताधाऱ्यांना कसली मस्ती आली", असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण