शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सीमावादात आठ गावे अंधारात!

By admin | Updated: February 4, 2015 00:52 IST

दफ्तरदिरंगाईमुळे महाराष्ट्र शासनाने वीज पुरवठा केला नाही. तेलंगण (पूर्वी आंध्र प्रदेश) राज्याने सहानुभूती मिळावी, म्हणून विजेचे खांब उभे करून वीज दिली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दरमाह

तेलंगणने दोन महिन्यांपूर्वी वीज कापली : महाराष्ट्राची वीज पोहोचलीच नाहीसंघरक्षित तावाडे - जिवती, (चंद्रपूर)दफ्तरदिरंगाईमुळे महाराष्ट्र शासनाने वीज पुरवठा केला नाही. तेलंगण (पूर्वी आंध्र प्रदेश) राज्याने सहानुभूती मिळावी, म्हणून विजेचे खांब उभे करून वीज दिली. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दरमाह प्रति कुटुंब ५० रुपये वीज देयकाच्या रुपात घेऊन विजेचा पुरवठा केला आणि आता मात्र दोन महिन्यांपासून तो खंडितदेखील केला. महाराष्ट्र आणि तेलंगण राज्याच्या (पूर्वी आंध्र प्रदेश) सीमेच्या वादात अडकलेल्या १४ पैकी सात ते आठ गावांतील नागरिकांची ही व्यथा आहे. देयकाची रक्कम न भरल्याचे कारण पुढे करीत त्यांना अंधारात ढकलले जात आहे तर अद्याप देयकच न पोहोचल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदरीत महाराष्ट्र तेलंगण राज्याच्या सीमावादात या गावकरी भरडले जात असून महाराष्ट्र शासनाचा गचाळ कारभार यासाठी कारणीभूत आहे.जिवती तालुक्याच्या सीमेवरील १४ गावे वादग्रस्त असून या गावांत दोन्ही राज्याच्या काही प्रमाणात सुविधा आहेत. पैकी लेंडीगुडा, भोलापठार, अंतापूर, येसापूर, इंदिरानगर, पदमावती, कामतगुडा या गावांत सुरूवातीपासूनच आंध्र प्रदेश राज्याची वीज सुरू होती. आंध्रमधून तेलंगण वेगळे राज्य झाल्यानंतर या राज्याने वीज कापल्याने सध्या येथे मोठी अडचण निर्माण झाली आहे.या सातही गावांजवळ राजीव गांधी ग्रामीण योजनेंतर्गत महाराष्ट्राचे खांब उभे करून केवळ ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. जिवतीचे उपकार्यकारी अभियंता एन.एम. वैरागडे यांनी येथील नागरिक जोपर्यंत डिमांड भरत नाहीत, तोपर्यंत वीज कनेक्शन देता येणार नसल्याचे सांगितले.तर, बल्लारपूर विभागाचे कार्यकारी अभियंता चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता, या ठिकाणी आताच आलो आहे, यासंदर्भात मला काहीच माहीत नसल्याचे सांगून त्यांनी हात वर केले आहेत.महाराष्ट्राची वीज नसली तरी पूर्वी तेलंगणा राज्यातून वीज पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांना अडचण नव्हती. मात्र तेलंगणानेही वीज कापल्याने पीठ गिरणी, शेतातील मोटारपंप बंद झाले आहेत. अतिसंवेदनशील व दुर्गम असलेल्या या गावातील नागरिक अंधारात वास्तव्य करीत आहेत. परीक्षेच्या तोंडावर वीज कापल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.ग्रामस्थ म्हणतात...वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांकडून डिमांड अर्ज प्राप्त झाले नाही, असे नेहमी ऐकायला मिळते, पण हे सर्व चुकीचे आहे. आम्ही २५-३० ग्रामस्थ मिळून डिमांड अर्ज १८ महिन्यांपूर्वी भरले आहेत. पण आम्हाला डिमांड पावती अजूनही दिली नाही. दोन महिन्यांपासून आम्ही अंधारात असून कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींने गावात येऊन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही.- उत्तम शंकर कराळे, ग्रामस्थ