शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेला भाजपा १६० जागांवर लढणार; अजित पवारांच्या गोटात स्वतंत्र लढण्याचा सूर

By अतुल कुलकर्णी | Updated: July 21, 2024 06:41 IST

Mahayuti Seat Sharing News: उर्वरित १२८ ते १३३ जागा शिंदेसेना, अजित पवार गट आणि मित्रपक्षांसाठी सोडणार

- अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप कोणत्याही परिस्थितीत १५५ ते १६०च्या खाली एकही कमी जागा लढविण्याचा प्रश्नच येत नाही, अशी माहिती भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने दिली आहे. विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यापैकी एवढ्या जागा लढविल्यानंतर उरणाऱ्या १२८ ते १३३ जागा शिंदेसेना, अजित पवार गट आणि मित्र पक्षांना दिल्या जातील, असेही या नेत्याने स्पष्ट केले.

विद्यमान विधानसभेत भाजपचे १०५ आमदार आहेत. काही अन्य सदस्यांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपची संख्या ११५ पर्यंत गेली होती. शिवसेनेचे ५५ सदस्य निवडून आले होते. त्यापैकी ४० सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ सदस्य निवडून आले होते. त्यापैकी ३९ आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. विद्यमान आमदारांपैकी काहींची तिकिटे बदलली गेली तरी जी जागा ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच त्या जागेवर उमेदवारी मिळाली पाहिजे, असा दावा तिन्ही पक्षांचे आमदार करत आहेत. तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांच्या तिकिटात बदल केला तरी त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील. असे असले तरी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत १६०च्या खाली एकही कमी जागा लढवायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, दिल्लीतून १५५ ते १६० च्यामध्ये ग्रीन सिग्नल मिळेल असेही या नेत्याने स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १०० जागा मागितल्या असल्या तरी त्यांना ८० ते ९० जागा दिल्या जातील. उर्वरित जागा अजित पवारांची राष्ट्रवादी व सहयोगी पक्षांना ठेवल्या जातील. अजित पवार गटाने मात्र आपल्याला ७० पेक्षा एकही जागा कमी चालणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच झाले तर आपण स्वतंत्र लढण्याचा विचार करू, असा राजकीय विचारही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सुरू असल्याचे वृत्त आहे.

भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नाहीमहाराष्ट्रात भाजपने स्वतंत्रपणे २८८ जागा लढण्याची वेळ आता निघून गेली आहे. जे आमदार ज्या पक्षातून निवडून आले आहेत, त्या जागा त्याच पक्षाकडे ठेवल्या जातील, उर्वरित जागांचे वाटप कसे करायचे एवढा मर्यादित मुद्दा आपल्यापुढे असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे हेच निवडणुका होत असताना मुख्यमंत्री म्हणून राहतील. त्यात कुठलाही बदल होणार नाही. पण, भाजपने कधीही, कोणाचे नाव पुढे करून विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही राज्यात लढवलेल्या नाहीत. ज्या राज्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती, अशी राज्ये किंवा मित्र पक्षांसोबत सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये भाजपने निवडणुकीच्या आधी कधीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही, असेही संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :MahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेvidhan sabhaविधानसभा