शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये भाजपाला बळकटी!

By admin | Updated: September 24, 2014 04:44 IST

रामशेठ ठाकूर आता भाजपात आले आहेत. त्यांच्यामुळे रायगड जिल्ह्यात पक्षाला चांगली ताकद मिळणार असून काँग्रेसवाल्यांवर मात्र ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आली

पनवेल : ‘रामशेठ ठाकूर आता भाजपात आले आहेत. त्यांच्यामुळे रायगड जिल्ह्यात पक्षाला चांगली ताकद मिळणार असून काँग्रेसवाल्यांवर मात्र ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पनवेल येथे केली. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी माजी खासदार रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला.छत्रपती संभाजी महाराज मैदानावरच्या या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती. ‘रायगडात आम्हाला म्हणावे तशे यश मिळाले नव्हते. मात्र रामशेठ व प्रशांत ठाकूर यांच्यामुळे पक्ष संघटनेला बळकटी येणार आहे,’ असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. टोल नाक्याच्या मुद्यावर लक्ष वेधत ते म्हणाले की, ‘या टोलचा जन्मदाता मीच आहे आणि हा प्रश्नही मार्गी लावेन. त्यामुळे ज्या कारणाने तुम्ही काँग्रेसला राम राम ठोकला तो सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, अशी ग्वाही नितिन गडकरी यांनी ठाकूर यांना दिली. ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा विलासराव देशमुख लाख पटींनी चांगले होते,’ अशी टीका त्यांनी केली. ‘टोल नाक्याच्या मुद्यावर राजीनामा देणारा माणूस भाजपात आला आहे,’ असे विनोद तावडे यांनी सांगितले. ‘रामशेठ यांच्यामुळे भाजपाचे सरकार पडले असे म्हणतात. त्यांना पक्षाने व्हिप बजावला होता. त्यामुळे ठाकूर यांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे केले. यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्न येत नाही,’ असे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. ‘रामशेठ तेव्हा भाजपात असते तर सरकार वाचले असते मात्र आता ते पक्षात आलेत, त्यामुळे राज्यात आपले सरकार येईल,’ असा आशावाद मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)