शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

“महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस जेवणापुरते वऱ्हाडी”: सुजय विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 15:01 IST

नवीन कामे करण्यापेक्षा केंद्राच्या कामांचे श्रेय घेण्याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कल आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

नगर: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकारने आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावरून विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षही टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर या निर्णयावरून महाविकास आघाडीतही मतभेद आहेत. महाविकास आघाडीतील नेतेच या निर्णयावरून एकमेकांवर टीका करत आहेत. यातच आता भाजप खासदारांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 

भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर सडकून टीका केली. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचे सांगत महाविकास आघाडीला नवरा-बायको आणि वऱ्हाडींची उपमा सुजय विखे पाटील यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अधिवेशनाच्या काळात विरोधपक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामगिरीचे कौतूक सुजय विखे पाटील यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी

महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी आहेत. नवऱ्याने दुसरी सवत आणू नये म्हणून शिवसेना मूकपणे अन्याय सहन करीत आहे, तर कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी वऱ्हाडी म्हणून आलेली काँग्रेस हटायला तयार नाही, असा खोचक टोला सुजय विखे-पाटील यांनी लगावला आहे. तसेच एक सक्षम आणि अभ्यासू विरोधीपक्ष म्हणून फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांच्या मागे पक्ष ठामपणे उभा राहिला. मागील सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी अशीच कामगिरी केली होती. दुर्दैवाने त्यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. उलट जिल्ह्यातील काही नेत्यांनी विरोधच जास्त केला. त्यामुळेच तर काँग्रेस सोडण्याची वेळ आमच्यावर आली, असे सुजय विखे-पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही

महाविकास आघाडी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यांचे प्रत्येक निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. त्यांना गरिबांचे हित कशात आहे, हे कळत नाही. त्याचे देणेघेणेही नाही. ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णयही असाच आहे. या निर्णयावर काय बोलावे, हेच कळत नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना याचे उत्तर देईल. नवीन कामे करण्यापेक्षा केंद्र सरकारच्या कामांचे श्रेय घेण्याकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कल आहे. केंद्र सरकारच्या योजना राबविताना अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष वापरल्याचं दिसून येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतूक करण्याचे किमान त्याचे श्रेय त्यांना देण्याचे औदार्यही या लोकांना दाखविता येत नाही, या शब्दांत सुजय विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाSujay Vikheसुजय विखेPoliticsराजकारण