शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

“महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस जेवणापुरते वऱ्हाडी”: सुजय विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 15:01 IST

नवीन कामे करण्यापेक्षा केंद्राच्या कामांचे श्रेय घेण्याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कल आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

नगर: महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकारने आमदारांना घरे देण्याच्या निर्णयावरून विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षही टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर या निर्णयावरून महाविकास आघाडीतही मतभेद आहेत. महाविकास आघाडीतील नेतेच या निर्णयावरून एकमेकांवर टीका करत आहेत. यातच आता भाजप खासदारांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 

भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर सडकून टीका केली. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचे सांगत महाविकास आघाडीला नवरा-बायको आणि वऱ्हाडींची उपमा सुजय विखे पाटील यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अधिवेशनाच्या काळात विरोधपक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामगिरीचे कौतूक सुजय विखे पाटील यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी

महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी आहेत. नवऱ्याने दुसरी सवत आणू नये म्हणून शिवसेना मूकपणे अन्याय सहन करीत आहे, तर कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी वऱ्हाडी म्हणून आलेली काँग्रेस हटायला तयार नाही, असा खोचक टोला सुजय विखे-पाटील यांनी लगावला आहे. तसेच एक सक्षम आणि अभ्यासू विरोधीपक्ष म्हणून फडणवीस यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांच्या मागे पक्ष ठामपणे उभा राहिला. मागील सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी अशीच कामगिरी केली होती. दुर्दैवाने त्यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. उलट जिल्ह्यातील काही नेत्यांनी विरोधच जास्त केला. त्यामुळेच तर काँग्रेस सोडण्याची वेळ आमच्यावर आली, असे सुजय विखे-पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही

महाविकास आघाडी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यांचे प्रत्येक निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. त्यांना गरिबांचे हित कशात आहे, हे कळत नाही. त्याचे देणेघेणेही नाही. ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णयही असाच आहे. या निर्णयावर काय बोलावे, हेच कळत नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना याचे उत्तर देईल. नवीन कामे करण्यापेक्षा केंद्र सरकारच्या कामांचे श्रेय घेण्याकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कल आहे. केंद्र सरकारच्या योजना राबविताना अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष वापरल्याचं दिसून येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतूक करण्याचे किमान त्याचे श्रेय त्यांना देण्याचे औदार्यही या लोकांना दाखविता येत नाही, या शब्दांत सुजय विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाSujay Vikheसुजय विखेPoliticsराजकारण