शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयाशी प्रामाणिक राहा

By admin | Updated: September 10, 2014 00:46 IST

आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण

करिअर महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद : लोकमत युवा नेक्स्ट व आकार फाऊंडेशनचा उपक्रमनागपूर : आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही, लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, हा गुरुमंत्र स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिला.लोकमत युवा नेक्स्ट व आकार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी व्यास सभागृहात आयोजित या महोत्सवाला विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे आदिवासी कल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे उपसंचालक संदीप साळुंखे, एस.डी.एम. रमेश घोलप, भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुनील आगवणे, प्रा. हुड्डा, तहसीलदार प्रकाश वाघमारे व आकार संस्थेचे संयोजक राम वाघ व रुपेश घागी उपस्थित होते. आपल्या प्रभावी मार्गदर्शनात डॉ. दराडे म्हणाल्या, जीवनात प्रत्येकाला स्वत:च स्वत:चा आदर्श होता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट ओळखण्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. जगाने आपल्याला काय दिले हे महत्त्वाचे नाही, तर आपण जगाला काय दिले, हे महत्त्वाचे आहे. समाजाला धनाऐवजी चांगले विचार द्यायचे असतात. यश मिळविण्यासाठी विश्वासार्हता, नीतीमत्ता या मार्गाचे पालन केले पाहिजे. अनुभव ही सर्वांत मोठी संपत्ती आहे. सकारात्मक दृष्टिकोन यशाचा मार्ग खुला करतो असेही त्या म्हणाल्या. अवगुण प्रत्येकांमध्ये असतात. परंतु यावर मात करीत खडतर परिश्रमाने यशाचे शिखर गाठणारे अनेक जण समाजात आहेत. त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे, असे विचार संदीप साळुंखे यांनी मांडले. रमेश घोलप म्हणाले, नशिबाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही तर निश्चित ध्येय, आत्मविश्वास, धीर न सोडण्याचा स्वभाव, मेहनत व सातत्य यामुळेच घवघवीत यश पदरी पडते. डॉ. दराडे यांच्या हस्ते ‘डब्ल्यू.डब्ल्यू.डब्ल्यू. आकार फाउंडेशन.ओआरजी’ संकेतस्थळाचे लोकार्पण झाले. संस्थेचे संयोजक राम वाघ आणि रूपेश घागी यांनी सांगितले, संस्थेच्यावतीने १० ते १२ जानेवारी २०१५ रोजी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी ५०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. (प्रतिनिधी)