शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एआयसीटीईची कारवाई

By admin | Updated: May 19, 2016 04:57 IST

रिझवी, अंजुमन-ए-इस्लाम तसेच वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, दत्ता मेघे आणि कोल्हापूरच्या डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला

मुंबई : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घातलेल्या अटींची पूर्तता न केल्याने मुंबईच्या रिझवी, अंजुमन-ए-इस्लाम तसेच वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, दत्ता मेघे आणि कोल्हापूरच्या डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. उच्च न्यायालयाने बुधवारी डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयावर कारवाई करण्यास स्थगिती दिली. तर अन्य महाविद्यालयांना एआयसीटीईकडे अपीलात जाण्याची मुभा दिली. त्यामुळे या सर्व महाविद्यालयांवर विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाबत टांगती तलवार आहे.सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे साडेसात एकर भूखंड असलाच पाहिजे, अशी अट एआयसीटीईने घातली आहे. मात्र या अटीची पूर्तता होत नसल्याची तक्रार ‘सिटीझन फोरम’ या एनजीओचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार संजय केळकर यांनी एआयसीटीईकडे केली. या तक्रारीवरून एआयसीटीईने संबंधित महाविद्यालयांची पडताळणी केली. तक्रारीत तथ्य आढळल्याने एआयसीटीईने मुंबईच्या रिझवी, अंजुमन-ए-इस्लाम, दत्ता मेघे, वसंतदादा पाटील प्रतिष्ठान आणि डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नका, असा स्पष्ट आदेश एआयसीटीईने राज्य सरकारला दिला.या आदेशाविरुद्ध या सर्व महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकांवरील सुनावणी उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठापुढे होती. रिझवी आणि अंजुमन-ए-इस्लामच्या म्हणण्यानुसार मुंबईत एवढा मोठा भूखंड उपलब्ध होणे अशक्य आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा आदेश सरकारला देण्यापूर्वी एआयसीटीईने भूमिका स्पष्ट करण्याची संधी दिली नाही. तर वसंतदादा प्रतिष्ठानने एआयसीटीईकडे अपीलच केले नाही. त्यामुळे न्या. अजय गडकरी आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने या सर्व महाविद्यालयांना एआयसीटीकडे अपील करण्याची मुभा दिली. या अपिलावरील सुनावणी २७ मे रोजी घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने एआयसीटीईला दिला. निर्णय लागेपर्यंत या सर्व महाविद्यालयांवर टांगती तलवार आहे. (प्रतिनिधी) अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने नाही!कोल्हापूरचे डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयातर्फे अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी एआयसीटीईची अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही, असे खंडपीठाला सांगितले. हे महाविद्यालय १९९२ पासून अस्तित्वात आहे. महाविद्यालयाकडे एकूण ४२ एकर भूखंड उपलब्ध आहे. मात्र तो दोन तुकड्यांत विखुरलेला आहे. एक चार एकर व दुसरा ३८ एकरचा आहे. महाविद्यालय चार एकर भूखंडावर उभारण्यात आले आहे आणि आजूबाजूला अन्य मोकळा भूखंड उपलब्ध नाही. एआयसीटीईची अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. वारुंजीकर यांनी केला.उच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून एआयसीटीईची अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही, असे म्हणत डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयावर कारवाई करण्यास स्थगिती दिली. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षी मगदूम महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.