शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक विकासासाठी यवतमाळ हवाई मार्गाने जोडा

By admin | Updated: December 30, 2014 00:52 IST

दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी

केळकर समितीची शिफारस : दळणवळणाच्या सोई-सुविधांचा अडसर, ब्रॉडगेज रेल्वे लाईनचाही प्रस्ताव राजेश निस्ताने - यवतमाळ दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नियमित हवाई वाहतूक सुरू करण्याची शिफारसही या समितीने केली आहे. शासनाने महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी डॉ.विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीमध्ये नऊ सदस्य आहेत. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीने आपला अहवाल नुकताच शासनाला सादर केला. हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावरही ठेवला गेला. या अहवालात यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणाची कारणे आणि उपाययोजना यावर ऊहापोह केला गेला आहे. दळणवळणाच्या सोईसुविधांचा अभाव हे प्रमुख कारण डॉ. केळकर समितीने यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणासाठी नमूद केले आहे. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि हवाई मार्ग विकसित करण्यावर भर देण्याचे त्यांनी सुचविले आहे. यवतमाळात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा विमानतळ आहे. तेथील धावपट्टीचा आणखी विस्तार करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणासाठी त्याचा वापर करावा, आमदारांनी सरकारवर दबाव वाढवावा शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा विकासात माघारला आहे. जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सोई आवश्यक आहे. त्यांच्या कमतरतेवर डॉ. विजय केळकर समितीने शिक्कामोर्तब करताना उपाययोजनाही सूचविल्या आहेत. केळकर समितीचा हा अहवाल जिल्ह्यातील आमदार-खासदारांना विकासासाठीच्या लढाईत ‘अस्त्र’ म्हणून उपयोगी पडणारा आहे. विकासाच्या मुद्यावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन एकत्र येणे व त्यातूनच केंद्र व राज्यातील सरकारवर दबाव निर्माण करणे अपेक्षित आहे. केळकर समितीच्या शिफारशींचा पाठपुरावा करण्यासोबतच लोकप्रतिनिधींनी आता वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. त्याचे काम वेगाने व्हावे म्हणून आमदारांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची अपेक्षा जिल्हाभरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.