शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

मिश्रशेतीतून ५० प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:09 IST

प्रगतिशील शेतकऱ्याचा उपक्रम

- अनिरु द्ध पाटील तलासरीच्या बोरीगाव येथील प्रगतिशील शेतकरी यज्ञेश सावे यांनी अडीच एकर क्षेत्रात मिश्रशेतीतून विविध पन्नास प्रकारचा भाजीपाला लागवड करून त्याची बाजारपेठेत विक्री करून नफ्याची शेती केली आहे. त्यांनी बाजारपेठेत मागणी आणि पुरवठ्याचे योग्य गणित जुळवून आणले आहे. त्यांच्या शेतीतील योगदानाबद्दल आतापर्यंत महाराष्ट्र शासन तसेच विविध संस्था आणि दै. ‘लोकमत’तर्फे ठाणे आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांच्या शेतीतील या व्यवस्थापन तंत्राविषयी जाणून घेऊया..मिश्रशेतीद्वारे पन्नासपेक्षा

अधिक पिकं घेण्याची संकल्पना कशी सुचली? ती प्रत्यक्षात कशी आली?

मी सध्या ५५ वर्षांचा असून चाळीस वर्षांपासून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करतो. अनेक वर्षांपासून शेतीत वेलवर्गीय, भाजीपाला, फळभाजी, फुलशेती आणि बागायती असे उत्पादन घेतले जाते. मात्र हे वेगवेगळ्या हंगामात आणि कमी-अधिक प्रमाणात होते. उत्पादित मालाची विक्री महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील उंबरगाव या औद्योगिक वसाहतीलगतच्या बाजारपेठेत स्वत: करतो. मी सेंद्रिय शेती करीत असून दर्जेदार उत्पादन घेतो. ही माहिती कळल्यानंतर मागील काही वर्षांपासून माझ्या शेतमालाला ठराविक ग्राहकवर्ग निर्माण झाला आहे.

मिश्रपीक पद्धतीचा फायदा काय? शेतकºयांनी ही पद्धत अवलंबावी का?

मिश्र पद्धतीत विविध शेतमालाचे उत्पादन घेतले जाते. एका पिकाचे उत्पादन घटले तरी अन्य पिकामुळे ही घट भरून काढता येते. बाजारात काही शेतमालाच्या किमतीत घट झाली, तरी अन्य पिकामुळे एकूण उत्पादनातील नफा-तोट्याचे गणित साधता येते. शिवाय या पद्धतीमुळे किडरोगाचा प्रादुर्भावही कमी होतो. योग्य नियोजनातून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे एकाच प्रकारचे उत्पादन घेण्यापेक्षा मिश्रशेतीला शेतकºयांनी प्राधान्य दिले पाहिजे.मागील तीन ते चार वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर हे सुरू केले. त्यामुळे मागणीनुसार लागवडीचे नियोजन करताना अडीच एकरात पन्नासपेक्षा अधिक प्रकारचे शेती उत्पादन घेण्याचे ठरले.

उत्पादित मालाची मागणी आणि पुरवठ्यातील व्यवस्थापनाचे तंत्र कोणते?

मला शेतीची प्रचंड आवड असून तो माझा छंद असल्याने कामाचा थकवा कधी जाणवत नाही. त्यामुळे रोपाच्या नर्सरीपासून ते जमिनीची मशागत, मजूर आणि खत व पाण्याचे व्यवस्थापन स्वत: करतो. ठराविक ग्राहकवर्ग निर्माण झाल्याने उत्पादित माल त्यांना घरपोच पोहचविण्याची युक्ती लढवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी आणि पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास फायदेशीर झाले आहे. त्याला ग्राहकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र