शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

"जेवण वाढा, मी आलोच..." वडिलांशी फोनवर अखेरचं बोलणं; काही क्षणातच युवकाचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:41 IST

ही बातमी समजताच रूग्णालय परिसरात नातेवाईक, मित्र व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. चंद्रवदनच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण आणि काका असा मोठा परिवार आहे

रत्नागिरी - तालुक्यातील नाखरे येथे बुधवारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात २९ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रवदन शिंदे दसूरकर असं या तरूणाचं नाव असून तो नाखरे इथला रहिवासी होता. तो घरी जात असताना घरापासून एक किलोमीटर अंतरावर ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, चंद्रवदन पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून जात होता. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची इको वाहनाशी जोरदार टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की, चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळावरून त्याचे घर अवघ्या १ किलोमीटर अंतरावर होते. चंद्रवदन हा एक बहुआयामी व्यक्तिमत्वाचा तरूण होता. त्याला ट्रेकिंगची प्रचंड आवाड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यावसायिक म्हणूनही ओळखला जात होता.

चंद्रवदनने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते. १ महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले. नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनानंतर त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर त्याचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. ही बातमी समजताच रूग्णालय परिसरात नातेवाईक, मित्र व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. चंद्रवदनच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण आणि काका असा मोठा परिवार आहे. 

या अपघातामुळे पावस नाखरे रस्त्यावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनने या घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचं काम सुरू आहे. नाखरे गावच्या पोलीस पाटलांनी या अपघाताची माहिती चंद्रवदनच्या वडिलांना दिली. घर जवळच असल्याने ते आणि चंद्रवदनची पत्नी लगेचच घटनास्थळी पोहचले आणि त्यांना चंद्रवदनचा धक्कादायक अपघात दिसला. 

जेवण वाढा, मी आलोच...

चंद्रवदन पावसहून निघाल्यानंतर त्याला वडिलांचा फोन आला. घरी कधी येतो आहेत असं त्यांनी विचारले. मी वाटेतच आहे. जेवायला वाढा, मी येतोच लगेच असं चंद्रवदन याने वडिलांना सांगितले. मात्र घराच्या १ किमी अंतरावर झालेल्या दुर्दैवी अपघातात तो निधन पावला. त्यामुळे मृत्यूआधी चंद्रवदनचं त्याच्या वडिलांशी अखेरचं फोनवर बोलणं झाले.  

टॅग्स :Accidentअपघात