शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

छावणीच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या २३ गायी, १० बैलांचा मृत्यू

By admin | Updated: October 5, 2016 18:10 IST

छावणीच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी परप्रांतातून येथे विक्रीसाठी आलेल्या जनावरांपैकी २३ गायी आणि १० बैलांचा अचानक मृत्यू झाला. तर मृत्यूच्या उंबरठ्यावर

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 05 -  छावणीच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी परप्रांतातून येथे विक्रीसाठी आलेल्या जनावरांपैकी २३ गायी आणि १० बैलांचा अचानक मृत्यू झाला. तर मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या सुमारे ४० जनावरांवर पशुसंवर्धन चिकित्सालय, मनपा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्तपणे युद्धपातळीवर उपचार सुरू केले. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी ८ उघडकीस आली.  या जनावरांना उपाशीपोटी ठेवल्याने अथवा विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केला. 
 पोलिस आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले की, छावणीमध्ये दर गुरूवारी गुरांचा आठवडी बाजार भरतो. या बाजारात म्हशी आणि गायी,बैल, शेळ्या ,मेंढ्या मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात. विशेषत: मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील जनावरांसह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील व्यापारी आणि पशुमालक येथे जनावरांची खरेदी विक्री करीत असतात. मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून विक्रीसाठी आणण्यात येणा-या गायी,म्हशी आणि बैलांना ट्रक, टेम्पोमध्ये अमानुषपणे कोंबलेल्या असतात. सुमारे तीन दिवसांचा त्यांचा हा प्रवास असतो. या प्रवासादरम्यान या जनावरांना खाण्या-पिण्यास दिली जात नाही. 
शिवाय दूरच्या प्रवासादरम्यान त्यांना वाहनात नीट बसता येत नाही आणि उभेही राहता येत नाही, असह्य वेदना सहन करीत त्यांना येथे आणल्या जाते. यामुळे अनेक जनावरे आजारी पडतात. अशाचप्रकारे दोन दिवसापूर्वी गुजरात आणि मध्यप्रदेशातील व्यापाºयांनी सुमारे शंभरहून अधिक गायी आणि बैल येथे वेगवेगळ्या वाहनातून आणले होते. गुरूवारच्या आठवडी बाजारात 
विक्री करण्यासाठी ही जनावरे आणण्यात आली होती. आठवडी बाजारातील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांना दावणीला बांधून ठेवण्यात आली होती. या शेडमध्ये सुमारे दोनशेहून अधिक जनावरे होती. यापैकी२३ गायी आणि १० बैल हे बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृतावस्थेत आणि आणखी तेवढीच जनावरे गंभीर आजारी असल्याचे दिसले. याबाबतची माहिती मिळताच महानगर पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त माणिक बाखरे, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, छावणी ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. 
 
तीसगाव शिवारात शवविच्छेदन
पशुंच्या मृत्यूचे अचूक  कारण समोर यावे,याकरीता सर्व मृत पशुंचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तीसगाव येथे शवविच्छेदन केले जात आहे. यासाठी पुणे येथील राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचे तज्ज्ञांचे पथक  सहभागी होणार आहे. शिवाय मृत पशुंचा व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
 
आजारी पशुवर उपचार
याची माहिती खडकेश्वर येथील सर्वपशुचिकित्सालयास कळविण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त एम.एन. आठवले, सह आयुक्त डॉ. जी.एन.पांडे, डॉ.एस.के. चंदेल,पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचे डॉ.प्र्रशांत चौधरी, डॉ. डी.बी. कांबळे, डॉ. दिलीप भालेराव, डॉ.विलास काळे,डॉ.अतिश कुलकर्णी, डॉ. आश्रुबा गाढवे,डॉ.लिंबाजी वाघमारे यांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केले.
 
मरण पावलेल्या पशुंची आणि आजारी पशुंची अवस्था पाहुन चाºयातून विषबाधा झाल्याने अथवा तीन ते चार दिवस विना अन्न पाण्यामुळे तडफडून त्यांचा अंत झाला,असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी शवविच्छेदानानंतरच त्यांच्या मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होईल. यामुळे सर्व आजारी गायी आणि बैलांवरविषबाधेसह अन्य उपचार सुरू असल्याचे डॉ.पांडे यांनी सांगितले. सध्या आजारी  पशुंना प्रत्येकी पाच सलाईन लावण्यात येत आहे.या उपचारांना ही जनावरे प्रतिसाद देत असल्याचे ते म्हणाले. 
 
छावणी बाजाराच्या कंत्राटदारांवर गुन्हा
छावणीतील आठवडी बाजारात दाखल होणाºया सर्व जनावरांची काळजी घेण्याची जबाबदारीही आठवडी बाजाराचाकंत्राटदार यांची आहे. यामुळे जनावरांच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदार अजीम देशमुख यांच्याविरोधात छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी दिली.