शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य वाचक आणि तरुणांमध्ये संवाद व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST

लातूर : समाजातील कालबाह्य मुल्ये आणि तत्वे नाकारून पुरोगामी मुल्ये व तत्वे स्वीकारण्याचे बौद्धिक साहस, समाजप्रबोधन पुस्तिकामालेच्या माध्यमातून होईल. ...

लातूर : समाजातील कालबाह्य मुल्ये आणि तत्वे नाकारून पुरोगामी मुल्ये व तत्वे स्वीकारण्याचे बौद्धिक साहस, समाजप्रबोधन पुस्तिकामालेच्या माध्यमातून होईल. त्यासाठी सामान्य वाचक आणि तरुणांमध्ये वैचारिक संवाद व्हावा, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी येथे केले. स्वारातीम विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि त्रैमासिक विचारशलाका यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तत्वज्ञान’ या पुस्तिकेच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्र. कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. पी. विठ्ठल उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, समाज शिक्षण पुस्तिकामाला हा उपक्रम विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्यावतीने सुरू केला आहे. त्याचा समाजातील युवावर्गाला नक्कीच फायदा होईल, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला संतोष गेडाम, डॉ. विवेक घोटाळे, डॉ. अनिल जायभाये, प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, प्राचार्य डॉ. एस. बी. अडकिणे, डॉ. संजय वाघमारे, डॉ. पंचशील एकंबेकर, डॉ. अमन बगाडे, डॉ. राजेसाहेब मारडकर, डॉ. वेदप्रकाश डोणगावकर, डॉ. रोहित गायकवाड, डॉ. नारायण कांबळे, उत्तम मांजरमकर, डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. माधव कांबळे, विवेक सौताडेकर, डॉ. गणेश बेळंबे, डॉ. जयद्रथ जाधव, बाळ होळीकर, डॉ. संजय गवई उपस्थित होते.

मूलगामी चिंतनातून सामाजिक क्रांती

आजचे बौद्धिक व शैक्षणिक पर्यावरण लक्षात घेता वंचित समाज घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचले नाही. ते पोहोचविण्यासाठी जबाबदारी बुद्धिवंत आणि राज्यकर्त्यांची आहे. मूलगामी चिंतनातूनच सामाजिक क्रांती व उन्नती होऊ शकते. त्यासाठी वैचारिक मानसिकता सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार म्हणाले.