शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साखर प्रति किलो ३ रुपयांनी वधारली; मेथी, पालक, शेपूच्या दरात घसरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST

लातूर : दिवाळीनंतर खाद्यतेल पुन्हा प्रति किलो १० ते १५ टक्क्यांनी महागले आहे. तर भाजीपाल्यांचे दर मात्र कवडीमोल ...

लातूर : दिवाळीनंतर खाद्यतेल पुन्हा प्रति किलो १० ते १५ टक्क्यांनी महागले आहे. तर भाजीपाल्यांचे दर मात्र कवडीमोल झाले आहेत. मेथी, पालक, शेपूच्या तीन पेंढ्या १० रुपयांमध्ये मिळत असल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तूर डाळ, चनाडाळ आणि मसूर डाळीचे भाव या आठवड्यात स्थिर आहेत. मूग डाळ १२० रुपयांच्या घरात गेली आहे.

ऐन दिवाळीच्या सणात खाद्यतेल, चनाडाळीने भाव खाल्ला होता. दिवाळीनंतर अचानकपणे भाजीपाल्यांचे भाव शंभरीच्या घरात होते. दिवाळीनंतर दोन आठवडे साखरेचे दर स्थिर होते. आता प्रति किलो २ ते ३ रुपयांनी साखर महागली आहे. भाजीपाला आवाक्यात असून, भेंडी ३५, पत्तागोबी २५, फुलकोबी २५, गवार ५०, टोमॅटो २० रुपये, बटाटे ३० ते ३५ रुपये, मेथी, पालक, शेपू तीन पेंढ्या १० रुपये, चुका ४० रुपये, कांदा पेंढी ५ ते ८ रुपये, शिमला मिरची ३० रुपये, हिरवी मिरची २५ रुपये, कोथिंबीर १० रुपयांना पेंढी. वांगी १५ रुपये, दोडका ४० रुपये, भोपळा २० रुपये नग, वरणा ४० रुपये, गाजर ३० रुपये किलो, करडई भाजी ३० रुपये, हरभरा भाजी ५० रुपये, काकडी प्रति किलो ३० रुपये दराने मिळत आहे.

किराणामध्ये खाद्यतेल १२० रुपये किलोने मिळत आहे. साखर ३५ वरून ३८ वर गेली आहे. खोबरं १८०, शेंगदाणा ९० ते १००, पोहे ४० रुपये, तांदूळ ३५ ते ५०, चुरमुरे प्रति किलो ५० ते ६० रुपये दराने मिळत आहे. गत आठवड्यात किराणा मालाचे भाव वधारले असून, भाजीपाला मात्र घसरला आहे.

किराणा मालाच्या डाळीमध्ये मूगडाळ आणि तूरडाळ सर्वाधिक महाग आहे. प्रति किलोला १२० रुपयांचा दर असून, चनाडाळ ७० रुपये, मसूर डाळ १०० रुपये प्रति किलो आहे. खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा वधारल्या आहेत. ९५ रुपयांवरून १२० रुपये प्रतिकिलो भाव पोहोचला आहे. यातून महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे.

एकिकडे भाजीपाल्यांचे दर घसरले आहेत. तर दुसरीकडे साखरेचा दर मात्र वधारला आहे. दिवाळीत ३४ ते ३५ रुपये किलो मिळणारी साखर आता ३८ रुपये दराने मिळते.

किराणामध्ये साखरेबरोबर खाद्यतेल महागले आहे. सर्वाधिक साखर, खाद्यतेल आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची मागणी असते. याच वस्तूंचे भाव गत आठवड्यात वधारले आहेत. काहींचे भाव मात्र स्थिर आहेत.

-गोविंद खंडागळे,

व्यापारी

सध्या थंडीचे दिवस असल्याने फळांना मोठी मागणी आहे. सफरचंद, चिकू, पेरू, सीताफळ, डाळिंब व इतर फळांची मोठी आवक होत आहे. प्रति किलो १०० रुपयांच्या घरात दर आहेत. सफरचंद ८० ते १०० रु., पेरु ३० ते ४० रुपये.

- बाबा शेख,

फळविक्रेता

दिवाळीनंतर भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले होते. आता दोन आठवडे झाले भाव घसरले आहेत. सध्या २० ते ३० रुपये दराने प्रति किलो भाजीपाला मिळू लागला आहे. मेथी, पालक, शेपूचे भाव तर मातीमोल झाले आहेत.

- भीमा शिंदे,

भाजीपाला विक्रेता