शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी खड्ड्यात; ५० टक्के ग्रामीण मार्गावर फेऱ्या बंद, अनेक ठिकाणचे मार्ग बदलले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

ग्रामीण मार्गावरील प्रवासी भारमान वाढत नसल्याच्या कारणावरून, या बसेस महामंडळ प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आल्या आहेत. ज्या मार्गावर प्रवासी भारमान ...

ग्रामीण मार्गावरील प्रवासी भारमान वाढत नसल्याच्या कारणावरून, या बसेस महामंडळ प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आल्या आहेत. ज्या मार्गावर प्रवासी भारमान आहे, त्याच मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या माेठी आहे. लातूर आगारातील ११५ पैकी ७६ बसेस सुरू आहेत. उदगीर आगार - १११ पैकी ७६ बसेस सुरू, अहमदपूर आगार - ९३ बसेसपैकी ५६, निलंगा - ८७ बसेसपैकी ६३ आणि औसा आगारातील एकूण ७९ बसेसपैकी ५३ बसेस सध्याला विविध मार्गांवर सुरू आहेत.

या मार्गावरील फेऱ्या बंद...

ग्रामीण भागातील प्रमुख मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून महामंडळाने टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू केली आहे. ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी नाही, त्या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. हे मार्ग ताेट्यातील आहेत. त्या मार्गावरील प्रवासी सेवाही महामंडळासाठी इंधनाला महाग आहे. मात्र, प्रवाशांचा विचार करून या मार्गावरील बसेस सुरू ठेवण्याची वेळ आली आहे, तर ग्रामीण भागातील ५० टक्के बसेस अद्यापही प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बंदच ठेवण्यात आल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या मार्गावर जादा बसेसची व्यवस्था...

लातूर विभागातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या मार्गावरील ५० टक्के ऑपरेशन सध्याला बंद आहे. या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने, त्या बसेस बंद करून इतर मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. सध्याला लांबपल्ल्याच्या मार्गावर प्रवाशांची हाेणारी गर्दी पाहता, महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे. मात्र, सध्याला याही मार्गावरील २५ टक्के ऑपरेशन बंदच आहे.

एसटीचा खर्च वाढला

डीझेल १०० रुपयांच्या घरात गेले आहे. मात्र, प्रवासभाड्यात कुठलीही वाढत केलेली नाही. आहे त्या प्रवासभाड्यात सध्याला प्रवाशांना महामंडळ सेवा देत आहे. परिणामी, महामंडळाचा कारभार सध्याला ताेट्यात आहे. अशा स्थितीत एसटीचा खर्चही वाढला आहे. हा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न संबंधित प्रशासनाला सतावत आहे. काटकसर करून सध्याला कारभार सुरू आहे.

परिस्थिती सुरधारेल...

ग्रामीण भागातील ५० टक्के, लांबपल्ल्याच्या मार्गावरील ७५ टक्के प्रवासी सेवा सुरू आहे. प्रवाशांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. टप्प्याटप्प्याने परिस्थिती सुधारली, तर बसेसची संख्या वाढविता येणार आहे. प्रवाशांची ज्या मार्गावर गर्दी त्या मार्गावर बसेस सुसाट धावत आहेत.

- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर.