शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुगंधी तंबाखूची चोरट्या मार्गाने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:20 IST

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे ...

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, चार तालुक्यांत वीसहून अधिक जनावरे वीज पडल्याने मृत्युमुखी पडली आहेत. निलंगा, औराद शहाजानी, जळकोट, चाकूर, अहमदपूर, आदी तालुक्यांत अवकाळी पाऊस बरसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.

शहरातील बाजारपेठेत संचारबंदीमुळे शुकशुकाट

लातूर : लातूर शहरात ८ ते १३ मे दरम्यान संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, गंजगोलाई, रेणापूर नाका, पाच नंबर चौक, आदी भागांत पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

खरीप हंगामासाठी कृषी विभागातर्फे मार्गदर्शन

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्या वतीने पेरणी क्षेत्र तसेच बी-बियाणांचे नियोजन केले जात आहे. यंदा शेतकऱ्यांनी घरगुती बियाणांचा वापर करावा, यासाठी गावस्तरावर कृषी विभागाच्या वतीने ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. तसेच बियाणे आणि खतावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

श्री. हेमरेड्डी मलम्मा यांची जयंती साजरी

लातूर : प. पू. श्री. हेमरेड्डी मलम्मा यांची जयंती राज्य यलम समाज कर्मचारी सेवा संघाच्या वतीने साजरी करण्यात आली. राज्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्यवान माचपल्ले, विजयकुमार पिनाटे, अंगद चामवाड, प्रकाश बंडापल्ले, निरंजन रेड्डी, गोविंद माडे, पांडुरंग वलमपल्ले, सुरेखा गुरमे, गोपिका बुड्डे, महानंदा बंडापल्ले, आदींसह महाराष्ट्र राज्य यलम समाज कर्मचारी सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा मदतीसाठी पुढाकार

लातूर : शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी एनसीसीचे विद्यार्थी सरसावले आहेत. शहरातील पोलीस पथकांसमवेत एनसीसीचे विद्यार्थी संचारबंदीचे पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करीत आहे. शहरातील दयानंद गेट परिसर, पाच नंबर चौक, एक नंबर चौक, महात्मा गांधी चौक, रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, आदी ठिकाणी एनसीसीचे विद्यार्थी आपली सेवा बजावीत आहेत. दरम्यान, एनसीसी विद्यार्थी पोलिसांच्या मदतीसाठी सरसावले असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

ग्रामीण भागात अधिग्रहणाची मागणी

लातूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून, जवळपास ८१ हून अधिक गावांनी अधिग्रहणाची मागणी पंचायत समिती स्तरावर केली आहे. तसेच या प्रस्तावांची तहसील स्तरावरून पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर उपाययोजना राबविण्याबाबत निर्णय होणार आहे. टंचाई निवारणाची कामे प्रगतिपथावर असून, ज्या गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना तत्काळ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.