यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे,जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, सूर्यकांत पाटील, नीळकंठ बचाटे, धनराज दाताळ, ज्ञानेश्वर पवार, कैलास पाटील, शंकर बोळंगे, बाबुराव जाधव, महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, सचिन दाताळ, सुपर्ण जगताप, अमोल भिसे यांची उपस्थिती होती.
देशात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. देशातील वाहने व इतर बाबीसाठी लागणारे पेट्रोल परदेशातून आयात करावे लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने काळाची गरज ओळखून शासनाने साखर कारखान्याकडे मोलायसेस पासुन इथेनॉल तयार करण्याऐवजी तडक उसाच्या रसा पासुन इथेनॉल निर्मिती करण्यासंबंधी साखर कारखान्यांनाआवाहन केले होते. यास सकारात्मक प्रतिसाद देत मांजरा परिवाराचे मार्गदर्शक कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख,वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख, आ. धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार मांजरा कारखाना येथे चालू हंगामापासून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. देशातील साखरेचे उत्पादन व साखरेस मिळणारा दर पाहता उपपदार्थ निर्मितीवर भर देणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे उपपदार्थ निर्मितीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देणे सोयीचे ठरेल या हेतूने मांजरा साखर कारखाना येथे उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प चालू गळीत हंगामात राबविण्यात येत आहे.