शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचारातून नकारार्थी भाव कमी होण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

लातूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे. सकारात्मक विचार ...

लातूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे. सकारात्मक विचार वाढवून नकारार्थी भाव कमी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मनोविकार तज्ज्ञ डॉ. वैशाली पाटील यांनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानसिक आरोग्य व्यवस्थापन व विविध उपक्रम विभागांतर्गत ‘मन उधाण वाऱ्याचे’ या विषयावर त्या बोलत होत्या. डॉ. पाटील म्हणाल्या, मनोविकारांबद्दल समाजात खूप अंधश्रद्धा आहेत. योग्य व वेळेत उपचार घेतल्यास तीव्र मनोविकार आटोक्यात आणणे शक्य आहे. मानसिक आरोग्य बिघडल्यास शरिराला त्रास होतो. मानसिक आरोग्य बिघडण्यास सामाजिक आणि जैविक कारणे आहेत. त्यामुळे जसे शारीरिक आरोग्य आपण जपतो, तसे मानसिक आरोग्यही आपण जपले पाहिजे. दररोज शरिराच्या स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता नियमित केली पाहिजे. सकारात्मक विचार वाढवून नकारार्थी भाव कमी केले पाहिजेत. शारीरिक आरोग्याला आहार, व्यायाम आवश्यक आहे. तसे मानसिक आरोग्याला वाचन, निरीक्षण, अनुभव, चिंतन, मनन हे महत्त्वाचे आहे. मानसिक आजारातून व्यसनाधिनता वाढू शकते. त्यासाठी योग्य समुपदेशन व उपचार केल्यास व्यसनाधिनता नाहीशी करता येऊ शकते. कोरोना काळात मानसिक आरोग्य सुदृढ ठेवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

‘अंनिस’चे प्रधान सचिव माधव बावगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक अतुल सवाखंडे यांनी केले. सूत्रसंचालन धर्मराज चवरे यांनी केले तर अजय भालकर यांनी आभार मानले.