शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ना वाळूघाटाचे लिलाव ना उपशावर निर्बंध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST

लातूर- कुठे माती, कुठे पाणी तर कुठे क्षेत्रच भरत नसल्याने लातूर जिल्ह्यात प्रशासन दप्तरी केवळ दोनच वाळूघाट प्रस्तावित ...

लातूर- कुठे माती, कुठे पाणी तर कुठे क्षेत्रच भरत नसल्याने लातूर जिल्ह्यात प्रशासन दप्तरी केवळ दोनच वाळूघाट प्रस्तावित आहेत. तेही पर्यावरण मुल्यांकन आधार प्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मांजरा, तेरणा, तावरजासारख्या नद्या जिल्ह्यातून वाहतात. मात्र, या नदीवरील अनेक वाळूघाट प्राधिकरणच्या निकषात बसले नाहीत. त्यामुळे तब्बल तीन वर्षांपासून लिलाव झाला नाही अन् वाळू उपशावर निर्बंधही नाहीत.

लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्यातून प्रमुख नद्या वाहतात. यावर्षी बटनपूर, दौंडगाव, उमरगा, सलगा, आरजखेडा हे पाच वाळूघाट प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, याठिकाणी एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असल्याने प्राधिकरण समितीने प्रस्ताव नाकारून फेर सर्व्हेक्षण करण्यासाठी कळविण्यात आले. पुन्हा सर्व्हे झाल्यावर दौंडगाव व बटनपूरचा प्रस्ताव फेब्रुवारीत पाठविण्यात आला असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या असलेली बहुतांश ठिकाणची वाळू मातीमिश्रीत असल्याने मागणी नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनाधिकृतपणे उपसा असल्याने ब्रासचा दर मनमानी आहे. त्यावर प्रशासनाचा अंकुश नाही. राज्यातील नामांकित शहराच्या तुलनेत लातूरची वाळू महागली असल्याने सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नाला खीळ बसली आहे. प्रशासनाला लिलावातून मिळणाऱ्या महसुलापेक्षा दंडातून मिळणारी रक्कम अधिक असल्याने अवजड वाळूचा लिलाव होत नसल्याची चर्चा आहे. लिलावच होत नसल्याने वाळू व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत.

एकही वाळूघाट नाही...

लातूर जिल्ह्यात सद्या एकही वाळू घाट नाही. पूर्वी ५५ घाट होते. दुष्काळ, पावसाचे प्रमाण कमी झाले, परिणामी घाटांची संख्या घटत गेली. त्यातही पर्यावरण प्राधिकरण समितीच्या निकषांची पुर्तता होत नसल्याने अनाधिकृत वाळू उपशांचे प्रमाण वाढत आहे. वर्षभरात महसूल विभागाने अनाधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईतून १ कोटी ३२ लाखांचा दंड वसूल केला आहे. प्रस्तावित असलेल्या दोन घाटांचा लिलाव झाला असता तर त्यातून ४४ लाखांचा महसूल अपेक्षित होता.

दोन वाळू घाट प्रस्तावित...

पर्यावरण मुल्यांकन आधार प्राधिकरण समितीच्या निकषानुसार वाळू घाटाचा लिलाव करण्यासाठी किमान दोन हेक्टर क्षेत्र लागते. तसेच वाळूची खोली एक मीटर असायला हवी. आपल्याकडे पाण्यातून वाळू काढण्यासाठी बोटीला परवानगी नाही. मातीमिश्रीत वाळू असल्याने प्रतिसाद नाही. पर्यावरण प्राधिकरणच्या निकषात वाळू घाट बसत नसल्याने लिलाव नाहीत. देवणी तालुक्यातील दोन वाळू घाटाचा प्रस्ताव समितीकडे पाठविला आहे. अनाधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून जवळपास दीड कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे. - महेश सावंत, प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी, लातूर