शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नागतीर्थवाडी पंचायतीने वृक्षलागवडीतून साधले अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:21 IST

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे गाव तालुक्यातील सर्वप्रथम हागणदारीमुक्त गाव असून, केवळ ११० उंबरे असलेल्या या छोट्याशा गावाने सन २०१८ ...

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे गाव तालुक्यातील सर्वप्रथम हागणदारीमुक्त गाव असून, केवळ ११० उंबरे असलेल्या या छोट्याशा गावाने सन २०१८ च्या पाणी फाउंडेशनच्या वतीने घेतलेल्या वॉटरकप स्पर्धेत जलसंधारणाचे उत्कृष्ट कार्य केले. गावातील लोकांनी रात्रंदिवस श्रमदान करून, गावेच पाणीदार केली आहेत. या गावाची आता स्वतंत्र ओळख गावकऱ्यांनी आपल्या श्रमदानातून केली आहे. येथील ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीतून अर्थकारण साधले आहे. तालुक्यात दुसरा येण्याचा मान गावाला मिळाला असून, पाच लाखांचे बक्षीसही मिळाले आहे. याच निधीतून गावातील गायरानावर तहसीलदार सुरेश घाेळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पुढाकार घेत कोईमतूर जातीचे २५० चिंचवृक्षाची लागवड केली. या वृक्षलागवडीची पाहणी शनिवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली; तर लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या बाल उपक्रमाची पाहणीही त्यांनी केली.

यावेळी देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सरपंच प्रभाकर पाटील, उपसरपंच विष्णुदास गुणाले, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे, बाळासाहेब बिरादार, ग्रामसेवक श्रीकांत पताळे, तलाठी निंगुले अनिता, विस्तार अधिकारी मस्के, कैलवाडे, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग गुरुडे, दत्ता कोंबडे, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुणाले, धोंडराज गुणाले, शिक्षिका गुंगे, गायकवाड, केंद्रप्रमुख येलमटे, आदी उपस्थित होते.

गावकऱ्यांनी राबविला विधायक उपक्रम...

नागतीर्थवाडी ग्रामपंचायतीला पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत पाच लाखांचे पारितोषिक मिळाले. याच रकमेतून गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण न होऊ देता, फळझाडे लागवड करण्यात आली. यातून पर्यावरण संतुलनाबरोबर आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी काैतुक केले असून, याचा आदर्श इतर गावांनी घेतला तर ग्रामपंचायती स्वयंपूर्ण होतील, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले.