शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यनिर्मिती भाषा समृद्धीचे माध्यम ठरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन कार्यक्रमात 'जागतिकीकरण आणि मराठी साहित्य ...

उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन कार्यक्रमात 'जागतिकीकरण आणि मराठी साहित्य : प्रभाव परिणाम व आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते. सिंदगीकर म्हणाले, मराठी भाषा ही जगातील अत्यंत रसाळ भाषा असून तिच्या जवळपास बावन्न प्रकारच्या बोलीभाषा आहेत. बोली भाषेमुळे मराठी भाषा समृद्ध होते. त्यामुळे लेखकांने मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती करावी. तसेच सत्यासाठी आग्रह धरून मानवी मूल्यांचा आविष्कार करावा. जागतिकीकरणाचा मराठी भाषेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट ती जागतिकीकरणाचा प्रभाव व परिणाम पचवून काळाची आव्हाने पेलत काळाच्या ओघात टिकून राहील. त्यामुळे मराठी भाषिकांनी कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही. असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी 'पाऊसकाळ' या कवितेचे अत्यंत गोड व मधुर आवाजात गायन करून त्यांनी मानवी जीवनाचा अर्थ उलगडून दाखविला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांनी असे म्हटले की, जोपर्यंत मराठी माणूस भाषेचे मोठ्या प्रमाणात उपयोजन करील तोपर्यंत तिच्या भविष्यकाळाची चिंता करण्याचे कारण नाही. मराठी भाषा ही भविष्यकाळात चिरंतनदायी ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. सुरेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. देवीदास गायकवाड यांनी केले. आभार डॉ. नरसिंग कदम यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.