शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साठा मर्यादेमध्ये वाढ केल्याने कडधान्याचे दर वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

उदगीर : केंद्र सरकारने २ जुलै रोजी मूग वगळता इतर कडधान्यावर स्टॉक लिमिट करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेविरुद्ध ...

उदगीर : केंद्र सरकारने २ जुलै रोजी मूग वगळता इतर कडधान्यावर स्टॉक लिमिट करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेविरुद्ध सर्वच धान्य व्यापारी व दाळमिल मालकांनी विरोध करून बाजार समितीमध्ये धान्य खरेदी बंद केली होती. व्यापारी वर्गाची मागणी लक्षात घेऊन स्टॉक लिमिटमध्ये वाढ केल्याने गुरुवारी बाजारात तूर व हरभऱ्याच्या दरात प्रत्येकी २०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली. तर सोयाबीनची मात्र विक्रमी दरवाढ हाेत असल्याचे चित्र आहे.

सण-उत्सवाच्या काळात डाळी व तेलाच्या दरात दरवर्षी वाढ होत असते. त्यामुळे यंदा केंद्र सरकारने दर स्थिर राहावेत, म्हणून २ जुलै रोजी मूग वगळता तूर, हरभरा, उडीद, मसूर या कडधान्याच्या डाळींवर साठा मर्यादा ३१ ऑक्टाेबरपर्यंत लागू केली होती. शासनाच्या या आदेशाविरुद्ध राज्यातील सर्व धान्याचे व्यापारी व दाळमिल मालकांनी व बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी बंद करण्याचे ठरवून हा अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी केली होती. परंतु, व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी व ग्राहकांचे हित लक्षात घेता निर्णयात सुधारणा केली आहे. आता दाळमिल चालकांना त्यांच्या कारखान्याच्या वार्षिक क्षमतेच्या २५ वरून ५० टक्क्यांपर्यंत तर ठोक विक्रेत्यांना २०० वरून ५०० टन साठ्यामध्ये वाढ करता येणार आहे. शासनाने केलेल्या बदलाचे परिणाम गुरुवारी बाजारात दिसून आले. तूर व हरभऱ्याच्या दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ झाली. तर सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत असून, गुरुवारी ८ हजार २०० प्रतीक्विंटल दराने विक्री झाली. जुन्या सोयाबीनचा साठा जवळपास संपत आला असल्याने येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात सण-उत्सव असल्याने सोयाबीन तेलासह इतर सर्वच खाद्य तेलाचे दर वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्राच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा...

केंद्र सरकारने साठा मर्यादेमध्ये वाढ केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तूर व हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. पुढील काळात सणासुदीचे दिवस असल्याने दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

- बालाजी बच्चेवार, दाळ मिल चालक

आवक नसल्याने दरात होतेय वाढ...

मागणी व पुरवठ्यामध्ये मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांकडील शेतमाल संपला आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडील सोयाबीनचा साठा संपला असून, बाजारात आवक होत नसल्याने सोयाबीनचे दर वाढत आहे. येणाऱ्या काळात सणांचा मौसम चालू होईल, तेव्हा तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

-सागर महाजन, सोयाबीन कारखानदार