शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर कचरा जाळल्यामुळे गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:20 IST

थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचे आवाहन लातूर : लातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील वीजग्राहकांकडे मोठ्या ...

थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचे आवाहन

लातूर : लातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील वीजग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे ज्या वीज ग्राहकांकडे बिल थकलेले आहे त्यांनी तात्काळ भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कृषिपंपधारकांचा वीज बिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २ लाख १० हजार शेतकऱ्यांनी ८२ कोटींचे वीज बिल भरले आहे. वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे शेतशिवाराचा आसरा

लातूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दरम्यान ग्रामीण भागातील अनेक गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने अनेक ग्रामस्थ कुटुंबासह शेतात राहायला गेल्याचे चित्र आहे. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असून, शेतातच अनेकांचा मुक्काम आहे. औसा, उदगीर, नागरसोगा, निलंगा, जळकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ, चाकूर आदी तालुक्यांतील ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे. शेतातील गोठ्यात अनेकांचे संसार थाटत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायतींच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी

लातूर : ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायतींच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण फवारणी तसेच मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले जात आहे. तसेच दवंडीद्वारे जनजागृती केली जात असून, कोणताही आजार अंगावर न काढता नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई

लातूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाच्या वतीने पथकांची नियुक्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या वतीने गस्त घातली जात असून, वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू असल्यास गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. व्यावसायिक, नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेणापूर नाका परिसरात स्वच्छतेची मागणी

लातूर : शहरातील रेणापूर नाका परिसरात मनपाची घंटागाडी नियमित येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. परिणामी, अनेक जण रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लाॅटवर कचरा टाकत आहेत. दरम्यान हाच कचरा हवेसोबत रस्त्यावर उडत आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी मनपाच्या स्वच्छता विभागाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष असून, तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

वीजपुरवठा खंडित होत असल्याने गैरसोय

लातूर : शहरासह ग्रामीण भागात सध्या वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने पाऊस असलेल्या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महावितरणच्या वतीनेही मान्सूनपूर्व कामे केली जात आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने अनेक जण कूलरचा आधार घेतात. मात्र, वीज गुल होत असल्याने गैरसोय होत आहे. त्यातच दोन दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पाऊस काही ठिकाणी असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.