शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावी वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार? विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा- महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइनचा उपक्रम राबविण्यात आला. आता प्रत्यक्ष ...

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा- महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइनचा उपक्रम राबविण्यात आला. आता प्रत्यक्ष नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण होतो की नाही, अशी पालक- विद्यार्थ्यांना चिंता आहे. आता परीक्षा तोंडावर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. आता शाळा सुरू झाल्या असून, जिल्ह्यात ४८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. आजमितीस दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के तर बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्के झाला आहे. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. आता परीक्षा महिना-दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. परीक्षेपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होईल का, असा प्रश्न असल्याने, पालक, विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दहावीचा अभ्यासक्रम

शाळा सुरू होऊन दीड महिना होत आला आहे. अभ्यासक्रम २५ ते ३० टक्के पूर्ण झाला आहे. मोजक्याच धड्यावर विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांवर ताण येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.

बारावीचा अभ्यासक्रम

दहावीनंतर बारावीचे वर्ग जवळपास दोन आठवड्यांनंतर सुरू झाले. २० ते २५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. ऑनलाइनलाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे. सर्वसाधारण २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. तरीही उरलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तासिका घ्याव्या लागतील.

परीक्षा जवळ आल्या असल्याने अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करावा. लाॅकडाऊन काळात अभ्यासावर भर दिला. मात्र, काही अडचणी आल्यास शिक्षकांना विचारण्यास शाळा सुरू नव्हत्या. आता शाळा सुरू असल्याने अभ्यासातील अडचणी दूर करण्यास मदत होत आहे.

- दहावीचा विद्यार्थी

महाविद्यालय उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे वैयक्तिक अभ्यासावर अधिक भर दिला जात आहे. शिक्षकांचे मागर्गदर्शनही मिळत आहे. वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यास बोर्ड परीक्षेचा सराव करता येईल.

- बारावीचा विद्यार्थी