शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घरणी- साकोळच्या जलसाठ्यावर होणार २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील घरणी आणि साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०२०- २०२१ ...

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील घरणी आणि साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०२०- २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येऊन २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन पाणी वापर संस्थाच्या मदतीने करण्यात येणार असल्याचे नियोजन येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव हे चारही प्रकल्प यंदा शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरले आहेत. घरणी आणि साकोळच्या पाणी साठ्यावर सन २०२०- २०२१ च्या रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एन. मदने यांच्या अध्यक्षतेखाली येथील अनंतपाळ नूतन विद्यालयात पाणी पुरवठा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी ॲड. संभाजीराव पाटील, ॲड. विश्वंभराव माने, प्रभाकरराव कुलकर्णी, नामदेवराव जगताप, विठ्ठल उंबरगे, उपविभागीय अभियंता गोरख जाधव, शाखाधिकारी पी.व्ही. पाटील, मंडळ कृषी अधिकारी बी.एस. गाढवे, नितीन जुंबड, संग्राम डोंगरे यांची उपस्थिती होती.

यावेळी कालवा आणि साठा सिंचन करण्यासाठी पाणी वापर संस्थांनी मदत केल्यास पाटबंधारे विभाग सिंचनाचे नियोजन करू शकते, अशी भूमिका गोरख जाधव यांनी मांडली. त्यामुळे पाणी वापर संस्थानी मदत करण्याची हमी दिली. २ हजार ६७२ हेक्टर्सवर सिंचन योजना राबविण्यात येऊन रब्बी हंगाम यशस्वी करण्यात येणार आहे. यावेळी विठ्ठल पाटील, जगदीश सूर्यवंशी, विठ्ठल शिंदे, अण्णाराव जाधव, माधव शिरुरे, बबन जाधव, गणेश पेठे, सद्विवेक मिरकले, शिवा डोंगरे, अंगद माने, पंडित लवटे, सुरेश पेठे आदींची उपस्थिती होती.

कालवा सिंचनाचे दोन आवर्तन...

रब्बी हंगामासाठी घरणी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे सिंचनाच्या दोन फेऱ्या घेण्यात येणार असून कालवा सिंचनाच्या माध्यमातून ६३७ हेक्टरचे सिंचन करण्यात येणार आहे. घरणी आणि साकोळच्या पाणीसाठ्यावर २ हजार ३५ हेक्टर्स अशा एकूण २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन नियोजन करण्यात आले आहे.

घरणी प्रकल्पाचे उजवा आणि डावा असे दोन कालवे असून, दोन्ही कालव्याचे महिनाभराच्या अंतराने दोन आवर्तन घेण्यात येणार आहेत. त्यासाठी चंद्रहास माने, राजेंद्र पांचाळ, मनोज जामगे, एस.पी. केजकर, अंजना होळकर, बस्वराज बिराजदार, बी.एम. मरे, गोविंद मोरे आदींनी पुढाकार घेतला आहे.