शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेरा येथील लग्न साहेळ्यातील गर्दीप्रकरणी दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST

: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर शहर आणि पिंपळफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकावर रेणापूर पाेलीस, नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाई ...

:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर शहर आणि पिंपळफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकावर रेणापूर पाेलीस, नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाई करण्यात आली. यातून एकूण ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर शेरा येथील एका लग्नसाेहळ्यात माेठ्या प्रमाणावर गर्दी जमविल्याप्रकरणी प्रशासनाकडून दहा हजारांचा दंड ठाेठावला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रेणापूर नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला गुरुवारपासून रेणापूर-औसा विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, रेणापूर येथील तहसीलदार राहुल पाटील, रेणापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, रेणापूर नगरपंचायतीचे पाणीपुरवठा प्रमुख विभुते यांनी रस्त्यावर उतरत विन मास्क फिरणाऱ्या, वाहन चालविणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शनिवारअखेर ३५० जणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून जवळपास ३५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या आणि काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा, स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समाेर आले आहे. अशा नागरिकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. रेणापूर आणि पिंपळफाटा येथील पाेलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. याची नाेंदही पाेलीस ठेवत आहेत. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला जात आहे.

लग्नसाेहळा अयाेजकांवरही झाली कारवाई...

रेणापूर तालुक्यातील शेरा येथे एक लग्न साेहळा हाेता. दरम्यान, या लग्न साेहळ्यासाठी माेठ्या संख्यने पाहुणे-रावळे एकत्रित आले हाेते. लग्न साेहळ्यासाठी एकत्रितपणे जमलेल्या नागरिकांवर स्थानिक प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमावली ठरविण्यात आली आहे. या नियमांचे पालन हाेत नसल्याचे समाेर आले आहे. लग्न साेहळे, इतर गर्दीचे कार्यक्रम बिनधास्तपणे आयाेजित केले जात आहेत. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही माेठी आहे. काही नागरिकांकडून काेराेनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.