शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीच ठरणार सोयाबीन बियाणे उत्पादक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित असून, ३ लाख क्विंटल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित असून, ३ लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. ‘महाबीज’कडून २० हजार, विविध खासगी कंपन्यांकडून ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. दरम्यान, शेतकऱ्यांकडे पावणेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्याचा दर अधिक असल्याने शेतकऱ्यांना स्वत:जवळील बियाण्याचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे बळीराजाच सोयाबीन बियाणे उत्पादक बनणार आहे.

जिल्ह्यात यंदा खरिपाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ९३ हजार हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होणार असून, ४ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यापाठोपाठ तूर ९० हजार हेक्टर, मूग ११ हजार, उडीद ९ हजार, ज्वारीचा १७ हजार हेक्टरवर पेरा अपेक्षित आहे. गेल्यावर्षी निकृष्ट बियाणे, अधिक पावसामुळे सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे आगामी खरिपासाठी सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा जाणवणार, हे लक्षात घेऊन कृषी विभागाने गावोगावी जनजागृती करुन बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

खरिपासाठी जिल्ह्याला ३ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. ‘महाबीज’कडून केवळ २० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यातील ४ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणार आहे. उर्वरित १६ हजार क्विंटलमधील बियाणे मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत तर हे बियाणे विक्री झाल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. विविध खासगी कंपन्यांचे ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे शेतकऱ्यांकडे ३ लाख ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता गावातील शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बियाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

बियाण्याच्या पोत्यामागे एक हजाराचा फरक...

‘महाबीज’चे बियाणे हे भरवशाचे गृहित धरले जाते. त्यातच महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या बियाण्याच्या एका पोत्यामागे जवळपास एक हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गावातील उगवण क्षमता चांगल्या असलेल्या शेतकऱ्यांजवळील बियाणे वापरणे गरजेचे ठरत आहे. त्यातून दोन्ही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांकडील बियाण्याचा वापर करावा...

एकदा सुधारित सोयाबीन बियाणे वापरल्यानंतर आलेल्या उत्पन्नातून पुढील तीन वर्षे तेच बियाणे वापरता येते. महाबीज बियाण्याला अधिक मागणी आहे. परंतु, ते यंदा कमी प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपनीकडील बियाणे वापरल्यास अधिक फायदेशीर ठरेल.

- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

घरचे बियाणे वापरावे...

शेतकऱ्यांनी खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याऐवजी आपल्या गावातील शेतकऱ्यांकडील बियाण्याचा वापर करावा. त्यापूर्वी उगवण क्षमता तपासावी. त्यामुळे बियाणे न उगवण्याची भीती राहणार नाही. कमी दरात चांगले बियाणे मिळेल. त्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून जनजागृती करुन प्रबोधन केले जात आहे.

- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.