शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
3
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
4
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
7
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
8
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
9
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
10
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
11
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
12
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
13
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
15
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
16
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
17
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
18
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
19
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
20
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
Daily Top 2Weekly Top 5

साेयाबीनचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांना काेट्यवधींचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST

लातूर येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनला गत महिनाभरात तब्बल दहा हजारांवर भाव मिळाला हाेता. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी ...

लातूर येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनला गत महिनाभरात तब्बल दहा हजारांवर भाव मिळाला हाेता. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव साेयाबीनला मिळाला आहे; मात्र आवक अत्यल्प हाेती. अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा यासाठी घरातच ठेवलेले साेयाबीन या काळात विक्रीसाठी बाजार समिती, अडत बाजारात आणले हाेते. ज्यांनी भाव पाहून साेयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले, त्यांच्या साेयाबीनला दुप्पट भाव मिळाला आहे; मात्र असे शेतकरी फार कमी आहेत. सध्याला यंदाच्या हंगामातील नवीन साेयाबीनची साेमवार, मंगळवारी माेठ्या प्रमाणावर आवक झाली अन् भाव चक्क गडगडत ६ हजारांवर आले. यातून प्रतिक्विंटल तब्बल तीन हजारांची घसरण झाली आहे. १६ सप्टेंबर राेजी लातुराच्या बाजारात साेयाबीनची १ हजार २९७ क्विंटल आवक झाली. याला कमाल भाव ९ हजार १००, किमान भाव ८ हजार ७०० आणि सर्वसाधारण भाव ८ हजार ९१० रुपयांचा मिळाला आहे. १८ सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात १ हजार २८९ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. याला कमाल भाव ८ हजार ९९१ रुपयांचा मिळाला. किमान भाव ६ हजार २०१ रुपये, तर सर्वसाधारण भाव ८ हजार ७८० रुपयांचा मिळाला आहे. त्यापाठाेपाठ साेमवार, २० सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात २ हजार ८५७ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. प्रति क्विंटलला कमाल भाव ६ हजार २९१ रुपये मिळाला, तर किमान भाव ५ हजार ५० रुपये आणि सर्वसाधारण भाव ६ हजार १५० रुपयांचा मिळाला आहे. मंगळवारी लातूरच्या बाजारात ५ हजार २२६ क्विंटलची आवक झाली असून, भाव मात्र गडगडले. साेयाबीनला कमाल भाव ६ हजार ३०० रुपयांचा मिळाला. किमान भाव ४ हजार ६०१ रुपये आणि सर्वसाधारण भाव हा ६ हजार १५० रुपयांचा मिळाला आहे. परिणामी, प्रतिक्विंटल जवळपास ३ हजारांचा फरक पडला आहे. बुधवारी लातुरात ९ हजार ८५ क्विंटलची आवक झाली आहे.

जुलैमध्ये मिळाला रेकाॅर्डब्रेक भाव...

लातूर आणि उदगीर येथील बाजार समितीत जुलै महिन्यात साेयाबीनचे भाव १० हजारांपेक्षा अधिक हाेते. आजपर्यंतचा हा भाव रेकाॅर्डब्रेक हाेता. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण हाेते. मात्र, सप्टेंबरअखेर शेतकऱ्यांच्या साेयाबीनची माेठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आणि भाव गडगडले. साेमवार, मंगळवारी तर चक्क ३ हजारांच्या घरात घसरण झाली. १८ सप्टेंबरला ६ हजार २०० रुपयांचा भाव असला तरी, पाेटलीतला भाव हा ५ हजार ५०० रुपयांच्या घरातच हाेता. ज्यावेळी ओलावा आणि माती असल्याचे कारण सांगितले जाते, त्यावेळी शेतकऱ्यांना आहे त्या भावापेक्षा कमी भावात शेतीमाल विकावा लागताे.