शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रोहयोच्या कामांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

टंचाई निवारणासाठी कृती आराखडा लातूर : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ...

टंचाई निवारणासाठी कृती आराखडा

लातूर : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत नवीन विंधन विहीर घेणे, विहीर, विंधन विहिरीचे अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, गाळ काढणे, प्रगतिपथावरील नळयोजनेची दुरुस्ती करणे, नवीन नळ योजना राबविणे आदी उपाययोजना राबविल्या जाणार आहे. ज्या गावात पाणीटंचाई आहे त्या ग्रामपंचायतीला पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करावे लागणार असल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

जेवळी रस्त्याची दुरवस्था ; वाहनधारक त्रस्त

लातूर : तालुक्यातील जेवळी ते लातूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांच्या वतीने संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

नवीन बांधकामांना आला वेग

लातूर : शहरासह नजीकच्या वसाहतीमध्ये नवीन बांधकामांना वेग आला आहे. हरंगूळ नाविम वसाहत परिसरात जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने बांधकामे वेगात सुरू आहेत. लॉकडाऊनपासून अनेकांनी आपल्या प्लॉटवर बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे.

मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले

लातूर : शहरातील खाडगाव रोड परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. अनेकजण घंटागाडी नियमित येत नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकत आहे. याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देऊन, नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

बंद असलेले सिग्नल सुरू करण्याची मागणी

लातूर : शहरातील काही चौकातील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या लातूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने अनेकजण सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडतात. मात्र, सिग्नल वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहर वाहतूक शाखेने बंद असलेले सिग्नल तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.