शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

काेरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

जिल्ह्यात जवळपास २ हजार २०० अंध व्यक्तींची नोंदणी आहे. अनेकजण उद्योग, व्यवसाय करीत आपली उपजीविका भागवितात. मात्र, गेल्या दीड ...

जिल्ह्यात जवळपास २ हजार २०० अंध व्यक्तींची नोंदणी आहे. अनेकजण उद्योग, व्यवसाय करीत आपली उपजीविका भागवितात. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत. परिणामी, अंध व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने इतर घटकांना मदत केली आहे. मात्र, अंध व्यक्तींना कोणत्याच प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या या संकटकाळात काही अंध व्यक्तींना कोरोनाची लागण झाली यामध्ये यशस्वी उपचारानंतर बरेही झालेत. मात्र, लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे अंध व्यक्तींवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांना शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.

आधार ही एकमेकांचाच...

कोरोनाच्या संकटापूर्वी नियमित हाताला काम मिळत होते. त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून हाताला काम नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने तात्काळ मदत करण्याची गरज आहे. - संदीप चोपडे, लातूर

कोरोनामुळे काम बंद आहे. हाताला काम नाही. मदत कोणाकडे मागणार. शासनाने इतर घटकांना ज्याप्रमाणे मदत केली त्याचप्रमाणे अंध व्यक्तींना मदत करण्याची गरज आहे. - मीरा चोपडे, लातूर

मी स्वत: गायक असल्याने गायनाचे कार्यक्रम करायचो. त्यातून आर्थिक उत्पन्न मिळत होते. मात्र, दीड वर्षांपासून सर्वच बाबींवर निर्बंध आले आहेत. परिणामी, गायनाचे कार्यक्रम झालेले नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न आहे. - जगन्नाथ जगताप, लातूर

कोरोना काळात मदतीची अपेक्षा...

जिल्ह्यात ५ ते ७ अंध व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. यातील सर्वांनीच कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुळे हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे शासनाने अंध व्यक्तींना मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांमधून होत आहे.

कोट...

शासनाने कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक घटकाला आर्थिक मदत केली आहे. मात्र, अंध बांधव मदतीपासून वंचित आहेत. संचारबंदीमुळे व्यवसायावर संकट आले आहेत. अनेक जण गायन, संगीत, तबलावादन यासारखे वर्ग घेऊन आपली उपजीविका भागवित असत. मात्र, सर्वच बाबीं बंद असल्याने आर्थिक स्त्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे शासनाने अंध बांधवांची दखल घेत त्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अंध बांधवांमधून होत आहे.