शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची जागेवरच केली जातेय कोविड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST

अहमदपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शनिवारी एकूण कोरोना बाधितांची संख्या १ हजार ३६० वर पोहोचली आहे. ...

अहमदपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शनिवारी एकूण कोरोना बाधितांची संख्या १ हजार ३६० वर पोहोचली आहे. शनिवारी तालुक्यातील ३३७ बाधित आहेत. शहरात १७० तर ग्रामीण भागात १६७ बाधित आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने कडक नियम लागू केले आहेत. दरम्यान, सध्या संचारबंदी आहे. तसेच विकेंड लॉकडाऊन ही आहे. मात्र, बाधितांचा आलेख कायम वाढत आहे. विविध कारणे सांगून काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही विनामास्क, नाहक फिरणाऱ्यांची संख्या दिसून येत आहे. विविध कारणांसाठी दुचाकी व चारही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसत आहे.

रस्त्यावरील गर्दी रोखण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य व पालिकेच्या वतीने शनिवारपासून अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. विनामास्क आणि अनावश्यक घराबाहेर पडणारे नागरिक, दुचाकीस्वारांना थांबवून त्यांची शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅपिड ॲंटीजन तपासणी केली जात आहे. यात जे पॉझिटिव्ह आढळतील, त्यांना मरशिवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. निगेटिव्ह आलेल्यांना घरीच राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. या नव्या उपक्रमामुळे नागरिकांची रस्त्यावरील संख्या अत्यंत कमी झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीच रस्त्यावर दिसत आहेत.

शनिवारी सकाळपासून या अभिनव उपक्रमास सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात ४६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६ पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांस संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. नरहरी सुरनर, डॉ. राजेश्वरी सोळंके, डॉ. शुभांगी सुडे, बसवराज लोहारे, भीमा कच्छवे, भानुदास गव्हाणे यांच्यासह आरोग्य पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

दररोज तपासणीचा उपक्रम...

दररोज तपासणीचा उपक्रम घेण्यात येणार आहे. दररोज एका चौकांमध्ये आरोग्य विभागाची टीम रुग्णवाहिकेसह थांबणार आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे व पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी सांगितले.