शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी झाली तर सखल भागांना धाेका, पावसाळ्यात या ठिकाणी न गेलेलेच बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

लातूर शहरातील पाणी साचणारी ठिकाणे... पावसाळ्याच्या दिवसात गावभागात माेठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. शिवाय, आनंदनगर, जयनगर, राजीवनगर, काेल्हे नगर, ...

लातूर शहरातील पाणी साचणारी ठिकाणे...

पावसाळ्याच्या दिवसात गावभागात माेठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. शिवाय, आनंदनगर, जयनगर, राजीवनगर, काेल्हे नगर, म्हाडा काॅलनी परिसर, मळवटी राेड परिसर, जुना औसा राेड परिसर, बरकतनगर, भीमनगर, बाैध्दनगर भागातील काही रस्त्यावर पाणी साचत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त हाेत आहे. या भागातील गटारी पावसाळ्यापूर्वी साफ करण्याची माेहीम हाती घेण्याची गरज आहे.

महापालिकेचे तेच ते रडगाणे...

लातूर शहर महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करत असल्याचा दावा करत आहे. तरीही शहरातील सखल भागात पावसाचे पाणी का साचत आहे, हे मात्र काेडे सुटत नाही. दरवर्षी थाेडासाही पाऊस झाला तरी शहरातील काही नगरामध्ये रस्त्यावरूनच पाणी वाहत असते. दरम्यान, काही ठिकाणी तलावासारखे दृश्य दिसून येत आहे. ही परिस्थिती दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात उद‌्भवत आहे.

पाणी साचण्याची कारणे...

१ लातूर शहरात पाणी साचण्याची प्रमुख कारणे सखल भाग आहे. याच भागात पाणी साचते, हा अनुभव आहे.

२ पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची माेहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र, ती प्रभावीपणे राबविली जात नसल्याने पाणी साचत आहे.

३ पाण्याचा निचरा याेग्य करण्यात न आल्याने माेठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहते.

४ पावसळ्यात पाऊस झाल्यानंतर गटारीतून वाहणारे पाणी बाहेर पडते आणि ते पाणी परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी साचते.

पाउस नकाे नकाे सा...

पावसाळ्यात थाेडासाही पाउस झाला तरी, आमच्या भागात पाणी साचते. या भागातील रस्त्यांची काम व्यवस्थित झाली नाहीत. शिवाय, गटारींचीही कामेही अद्याप व्यवस्थित झाली नाहीत. त्याचबराेबर महानगर पालिकेच्यावतीने गटारींची स्वच्छता वेळेवर करण्यात येत नसल्याने पावसाळ्यात या गटारी तुंबतात. यातून सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे.

- बाबुराव गायकवाड, लातूर

पावसाळ्याचे दिवस असल्याने सखल भागात, झाेपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी साचत आहे. जयनगर, राजीवनगर झाेपडपट्टीत अद्यापही रस्ते, गटारी आणि इतर सुविधांचा अभाव आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. परिणामी, पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर चिखल आणि त्यातच पावसाचे पाणी ठिकठिकाणी थांबत असल्याने नागरिकांची गैरसाेय हाेत आहे.

- पवन जाधव, लातूर