शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : हुंडा प्रथेसारख्या कुप्रथा, रुढी राेखण्यासाठी, निरपराध विवाहित महिलांचा छळ अन् हुंडाबळी थांबावेत, यासाठी ६० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : हुंडा प्रथेसारख्या कुप्रथा, रुढी राेखण्यासाठी, निरपराध विवाहित महिलांचा छळ अन् हुंडाबळी थांबावेत, यासाठी ६० वर्षांपू्र्वी देशात हुंडाबंदीचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याला २० मे १९६१ राेजी राष्ट्रपतींची अनुमती मिळाली आणि हा कायदा १ जुलै १९६१ राेजी लागू झाला. अर्थात १ जुलै २०२१ राेजी हा कायदा साठ वर्षांचा झाला. कायद्याच्या साठीनंतरही लातूर जिल्ह्यात तब्बल ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ झाल्याचे पाेलीस दप्तरी नाेंदविण्यात आलेल्या आकडेवारीवरुन समाेर आले आहे. धक्कादायक म्हणजे... यातील १४ महिलांचा हुंडाबळी गेला आहे. लातूरसह जिल्ह्यातील एकूण २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये जानेवारी २०१९ ते जून २०२१ या अडीच वर्षांच्या कालावधीत माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९मध्ये ६१८ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२०मध्ये ५३६ आणि जानेवारी ते जून २०२१ अखेर २८३ घटनांची नाेंद झाली आहे. ‘लाॅकडाऊन’मध्येही महिलांच्या छळांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनलाॅकमध्ये ‘भराेसा सेल’कडे तब्बल ५३८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील अनेक प्रकरणांत महिला तक्रार निवारण केंद्राच्यावतीने सुनावणी अन् समुपदेशन करण्यात आले आहे. यातून घटस्फाेटाच्या उंबरठ्यावर असलेल्या जाेडप्यांचे संसार पुन्हा जुळले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१९मध्ये ६१८ प्रकरणांची लातूरच्या भराेसा सेलने चाैकशी केली आहे. यात १६९ प्रकरणांत तडजाेड झाली असून, ३२३ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे तर ५७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हुंड्याबाबत मानसिकता कायम...

माहेरची परिस्थिती हालाखीची... आई-वडील माेलमजुरी करुन प्रपंच चालविणारे... अशास्थितीत सासरकडून विवाहितेचा हुंड्यासाठी छळ... या विचित्र काेंडीत अडकलेल्या महिला वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळतात. तर काही महिला धाडस करत पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात. यातून हुंडा आणि छळाची व्याप्ती समार येते. हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही सासरच्या मंडळींची मानसिकता बदलायला तयार नाही, हेच यातून समाेर आले आहे.

समुपदेशन आणि कायदेशीर सल्ला...

क्षुल्लक कारणावरुन सासरी विवाहितेचा छळ हाेताे. त्यातच पती-पत्नीत यातून बेबनाव निर्माण हाेताे. मग सुखी संसारात वादाची ठिणगी पडते आणि घटस्फाेटापर्यंत निर्णय हाेताे. अशावेळी महिलांचे मानसिक खच्चीकरण हाेते. त्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्राच्या ‘भराेसा सेल’कडून आधार दिला जाताे. त्यांचे समुपदेशन केले जाते, कायदेशीर सल्लाही दिला जाताे. हुंड्यासाठी हाेणारा छळ महिला सहन न करता, कायद्याचा आधार घेत बंड करतात.

- दीपा गीते, सहाय्यक पाेलीस निरीक्षक, लातूर