शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची शिरूर अनंतपाळसाठी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामासाठी १७ हजार ६२५ क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज आहे. बियाणांच्या उपलब्धतेसाठी तालुका ...

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात खरीप हंगामासाठी १७ हजार ६२५ क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज आहे. बियाणांच्या उपलब्धतेसाठी तालुका कृषी कार्यालयाने त्रिस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे. त्यात शेतकऱ्यांकडील, महाबीज आणि वखार महामंडळाकडून उपलब्ध होणारे तसेच खाजगी कंपन्याचे बियाणे राहणार आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८ हजार ५०० हेक्टर्स लागवडीस योग्य क्षेत्र आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीनचा पेरा करतात. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाकडून २३ हजार ८२५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार सोयाबीन बियाणांची उपलब्धता होणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, मंडळ अधिकारी सदाशिव गाढवे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्रिस्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांकडे सर्वाधिक म्हणजे १३ हजार ५८८ क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे सर्वेक्षण कृषी विभाकडून करण्यात आले. महाबीज आणि वखार महामंडळाकडून १ हजार क्विंटल बियाणे मागविण्यात आले आहे. खाजगी कंपन्यांकडून जवळपास १ हजार ९०० क्विंटल बियाणे उपलब्ध होत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी १७ हजार ६२५ क्विंटल बियाणांची गरज आहे. सध्या १७ हजार ७३५ क्विंटल बियाणांची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता योग्य बियाणांची निवड करावी, असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

खरीपाच्या पेऱ्याचे नियोजन...

खरीप हंगामासाठी २८ हजार ५०० हेक्टर्स लागवडीस योग्य क्षेत्र असून, त्यापैकी २३ हजार ८२५ हेक्टरवर सोयाबीन, ३ हजार ८०० हेक्टरवर तूर, १८८ हेक्टरवर हायब्रीड ज्वारी, ३०३ हेक्टरवर उडीद तर ३२५ हेक्टरवर मुग असा पेरा होण्याचा अंदाज आहे.

खरीप हंगामात पेरणी करताना शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सरी वरंबा पध्दतीचा वापर करावा. तसेच कोणत्याही बियाणांची पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असून, त्यासाठी अडचण येत असल्यास कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी केले आहे.