शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

आरटीई सोडतीत १६०४ विद्यार्थ्यांची झाली निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:18 AM

लातूर : आरटीई प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना निवडीचे संदेश प्राप्त झाले नव्हते. शिक्षण ...

लातूर : आरटीई प्रवेशासाठी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना निवडीचे संदेश प्राप्त झाले नव्हते. शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी सायंकाळी लातूर जिल्ह्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६०४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदरील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ मधील आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली होती. जिल्ह्यात १ हजार ७४० जागा असून, यासाठी ४ हजार २४ अर्ज प्राप्त झाले होते. यंदा राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र, पालकांना संदेश पाठवला नव्हता तसेच जिल्हा शिक्षण विभागाकडे यादी पाठविण्यात आली नव्हती. गुरुवारी सायंकाळनंतर यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६०४ विद्यार्थ्यांची शाळानिहाय निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ९७, औसा ७६, चाकूर ६८, देवणी ३४, जळकोट ५, लातूर ९४५, निलंगा १३५, रेणापूर २७, शिरूर अनंतपाळ १२, तर उदगीर तालुक्यातील २०५ अशा एकूण १ हजार ६०४ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे यांनी सांगितले.

तालुकास्तरावर होणार कागदपत्रांची पडताळणी...

आरटीई सोडतमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर असलेल्या पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. शिक्षण विभागाकडे नोंदणी केलेल्या शाळांना प्रवेशाबाबत योग्य त्या सूचना करण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितले.