शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

१४ वर्षांचा वनवास संपला; अखेर दशरथ स्वगृही परतले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:53 AM

मनःस्थिती बरी नसल्याने १४ वर्षांपूर्वी घरापासून दुरावलेले दशरथ अखेर स्वगृही परतले.

लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : मनःस्थिती बरी नसल्याने १४ वर्षांपूर्वी घरापासून दुरावलेले दशरथ अखेर स्वगृही परतले. ही कहाणी आहे सिंधुदुर्ग ते लातूर प्रवासाची. शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आणि बहिणीच्या मायेने दशरथ यांना घर गाठता आले. गेल्या वर्षी २१ मे २०२३ रोजी लातूर शहरातील औसा रोड लगत छत्रपती चौक भागात एक व्यक्ती असून ती नालीचे पाणी पीत आहे, काहीही कचऱ्यातले जेवण करत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांना मिळाली होती.

त्यानंतर रिलीजन टू रिस्पॉन्सबिलिटी फाउंडेशनच्या माध्यमातून राहुल पाटील, असिफ पठाण, गोपाळ ओझा, मुस्तफा सय्यद, आकाश गायकवाड यांनी त्या मनःस्थिती बरी नसलेल्या व्यक्तीला चिखली (जि. बुलडाणा) येथील दिव्य सेवा संकल्पच्या अशोक काकडे यांच्याकडे उपचारासाठी पाठविले. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दशरथ यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले. त्यांचे मूळ गाव कानेड (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) आहे. दशरथ हे अविवाहित आहेत. त्यांचे आई-वडील हयात नाहीत. मात्र, मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ करायचे ठरवले असून कुटुंबियांनी संस्थेचे आभार मानत आनंद व्यक्त केला. 

अनेकांना मिळाला दिलासा...रिलीजन टू रिस्पॉन्सबिलिटी फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वी अनेकांना दिलासा मिळाला आहे. मनःस्थिती बरी नसल्याने काही जण कुटुंबापासून दुरावतात. त्यांना कोणी जवळ करत नाही. घरच्यांनीही थकून शोध घेणे सोडलेले असते. पुलाखाली, तर कधी निवारा नसताना ते अमानवीय अवस्थेत आढळतात. त्यांना बरे करून कुटुंबाकडे सुपूर्द करणे शक्य असते, जे की कार्यकर्ते करत आहेत.

टॅग्स :laturलातूर