शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाला उपक्रमाच्या दिशेने १२ शाळांचा वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपडे पालटण्यासाठी ३५ शाळांची बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १२ ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपडे पालटण्यासाठी ३५ शाळांची बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १२ शाळांची उपक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. कोराेनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे ओसरल्यानंतर विद्यार्थी शाळेत उपस्थित झाल्यानंतर ते आश्चर्यचकीत होणार आहेत, अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळेतील प्रत्येक वस्तूवर विद्यार्थ्यांची नजर पडली तर त्यातून गणित, विज्ञान, इंग्रजी यासह सर्व विषयांचे ज्ञान लक्षात यावे, खेळता-खेळता शिक्षणाचे धडे मिळावेत म्हणून शिक्षणाशी निगडित असणाऱ्या प्रमुख २९ मुद्द्यांवर अधारित रंगरंगोटी, प्रतिकृती, माॅडेल, रॅम्प, ॲम्पिथिएटर, झोपाळा आदी साधनांची निर्मिती करून शालेय परिसर आकर्षक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी ३५ शाळांची पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने निवड केली. निवड करण्यात आलेल्या शाळांची बाला उपक्रमात अग्रेसर राहण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे.

तालुक्यातील या शाळांची निवड...

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा आहेत. त्यापैकी शिरुर अनंतपाळ केंद्रीय प्राथ. शाळा, कन्या शाळा, भोजराजनगर शाळा, दैठणा जिल्हा परिषद शाळा, तळेगावातील केंद्रीय प्रा. शाळा, डिगोळ येथील जिल्हा परिषद प्रा. शाळा, साकोळची कन्या शाळा, उत्तर शेंद येथील प्राथ. शाळा, साकोळची प्रशाला, येरोळ प्रशाला, उजेडची केंद्रीय शाळा, कांबळगाची केंद्रीय शाळा, लक्कड जवळगा येथील प्राथ. शाळा, शिवपूर प्राथ. शाळा, कळमगाव शाळा, बाकली प्राथ. शाळा, अंकुलगा राणी येथील प्राथ. शाळा, गणेशवाडी शाळा, हिप्पळगाव, अंकुलगा (स.), रापका शाळा आदी ३५ शाळांची निवड करण्यात आली आहे.

प्रभावी अंमलबजावणी...

तालुक्यातील बाला उपक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या ३५ शाळांपैकी १२ शाळांनी उपक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. काही ठिकाणी ओटे बांधणे, झोपाळे बसविणे, प्रतिकृती तयार करणे, रंगरंगोटी करणे, रॅम्प, ॲम्पिथिएटर तयार करणे सुरू आहे. अंकुलगा राणी आणि डिगोळ या शाळांनी उपक्रमाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे शाळांचे अंतरंग आणि बाह्यरंग बदलून गेले आहे. विद्यार्थीही शाळेत येण्यासाठी आतूर झाले आहेत.