शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग आरक्षण बदलणार का तेच राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:30 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अर्ध्यावरच थांबलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक जेव्हा पुन्हा सुरू होईल, त्यावेळी जाहीर झालेले ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अर्ध्यावरच थांबलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक जेव्हा पुन्हा सुरू होईल, त्यावेळी जाहीर झालेले प्रभाग आरक्षण बदलणार का, प्रभागांची संख्या बदलणार का, प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करणार का? अशा प्रश्नांनी निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांना घेरले आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असली, तरी महानगरपालिका प्रशासन मात्र निवडणूक आयोगाकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नसल्याचे सांगून वेळ मारुन नेत आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत १५ नोंव्हेंबर २०२० रोजी संपली आहे. वास्तविक या तारखेआधी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने तयारीसुध्दा सुरू झाली होती. प्रभाग निश्चिती, त्याच्या चतु:सीमा निश्चिती, प्रभागावरील आरक्षण, प्रभागनिहाय कच्च्या मतदार याद्या, त्यावरील हरकती, नंतर प्रक्क्या मतदार याद्या ही सर्व कामे महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पूर्ण केली.

परंतु कोरोना संसर्ग वाढतच गेल्यामुळे राज्य सरकारच्या विनंतीनुसार निवडणूक आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया ‘आहे त्या स्थितीत’ थांबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या सहा सात महिन्यांत निवडणुकीचे कोणतेही काम झालेले नाही. तसेच कोणत्याही सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. अशातच सर्वेाच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ठळक झाला. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून ओबीसींना अतिरिक्त ओबीसी आरक्षण दिले आहे, त्यांचे आरक्षण रद्द झाले.

ओबोसी आरक्षण रद्द झाले आहे म्हटल्यावर कोल्हापूर महानगरपालिकेतील ओबीसी आरक्षणही रद्द झाल्याचा अनेकांचा समज झाला आहे. त्यामुळेच महापालिकेची निवडणूक प्रक्रिया जेव्हा पुन्हा सुरू होईल तेव्हा ओबीसी आरक्षण रद्द करणार का, प्रभागांची संख्या बदलणार का? अशा अनेक प्रश्नांनी इच्छुकांना भंडावून सोडले आहे. ज्यांच्या प्रभागावर ओबीसी आरक्षण पडले आहे, तेथील खुल्या प्रवर्गातील इच्छुक सर्वच आरक्षण बदलणार, निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार, असा दावा करत आहेत. त्यामुळेच उच्छुकांमध्ये एकप्रकारची अस्वस्थता आहे.

- काय होऊ शकते?-

- महानगरपालिकेचे आरक्षण ४० टक्क्याच्या आत असल्याने बदलणार नाही, असा पालिका अधिकाऱ्यांचा दावा.

- निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा प्रभाग, आरक्षण टाकण्याचा आयोगाला अधिकार असल्याचा जाणकारांचा दावा.