शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील आंदोलनाला बळ देण्यासाठी कोल्हापुरात लढा सुरूच ठेवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST

कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी कोल्हापुरातील लढा असाच तेवत ठेवू, असा निर्धार ...

कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी कोल्हापुरातील लढा असाच तेवत ठेवू, असा निर्धार मिरजकर तिकटी येथील सभेत करण्यात आला. आंदोलन पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

केंद्र शासनाने शेतकरीविरोधी तीन कायदे केले असून या विरोधात कोल्हापुरात लढा सुरू आहे. हा कायदा शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे घातक आहे. याची माहिती सर्वांना होण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि मावळा कोल्हापूर यांच्या वतीने शहरातील प्रमुख चौकात सभा घेण्यात येत आहेत. ऐतिहासिक मिरजकर तिकटी येथून शनिवारी याची सुरुवात झाली.

माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या आंदोलनासाठी मावळा कोल्हापूरने शहरात जनजागृती सभा आयोजित करून आंदोलनाची धग कायम ठेवली आहे. अशाच प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात सर्वसामान्य लोकांच्या सहभागाने आंदोलन तेवत ठेवून दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देण्याचे काम करू.

टी. एस. पाटील म्हणाले, जमीन अधिग्रहण कायदा अशा प्रकारे लादण्याचा प्रयत्न झाला. त्याला तीव्र विरोध करण्यात आला. नव्याने केलेल्या तीन कायद्यांसाठीही अभूतपूर्व लढा उभा करून शेतकऱ्यांवरील संकट टाळू.

इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील म्हणाले, कोणतेही आंदोलन अथवा लढ्यात कोल्हापूरकर उतरले तर त्याची दखल देशाला घ्यावी लागते. या आंदोलनाची दखलही मोदी सरकाराला घ्यावीच लागेल. चंद्रकांत यादव, ‘आप’चे संदीप देसाई, अतुल दिघे, ॲड. अशोक साळोखे, नामदेव गावडे, संभाजी जगदाळे यांच्यासह मावळा कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी मनोगतातून मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला.

चौकट

सात दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा दिल्लीत धडक

शेतकऱ्यांवर अन्याय करून उद्योजकांना पोसण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. २० डिसेंबरपर्यंत कायदे मागे घ्यावेत अन्यथा दिल्लीत येऊन रस्ते बंद पाडू, असा इशारा जनता दलाचे रवी जाधव यांनी दिला.

फाेटो : १२१२२०२० कोल शेतकरी आंदोलन

ओळी : कोल्हापुरातील मावळा कोल्हापूरच्या वतीने मिरजकर तिकटी येथे केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात सभा घेतली. यावेळी माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, संदीप देसाई, सतीश कांबळे, रवी जाधव, चंद्रकांत यादव, बाबूराव चव्हाण, अतुल दिघे, उमेश पोवार, आदी उपस्थित हाेते.