शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

पंचगंगेची पाणीपातळी साडेतीन फुटांनी उतरली, कोल्हापूर जिल्ह्यात १६४ नागरिक स्थलांतरितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 12:02 IST

उद्यापासून पुन्हा 'मघा'चा पाऊस, चार दिवस राहणार सक्रिय

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची प्रामुख्याने उघडीप राहिली. अधूनमधून जोरदार सरीही कोसळत होत्या, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी आहे. परिणामी नद्यांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी साडेतीन फुटांनी कमी झाली असून अद्याप ३१ बंधारे पाण्याखाली आहेत.गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी,. भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४ मिली मीटर पावसाची नोंद झाली असली तरी घाटमाथ्यावरील तालुक्यात अधिक पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १५००, वारणातून १६३० तर दूधगंगा धरणातून ३१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी ओसरु लागले असून ३३ फुटांपर्यंत पातळी खाली आली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ९ खासगी मालमत्तांची पडझड होऊन २ लाख ५५ हजारांचे नुकसान झाले आहे.एसटीची वाहतूक सुरळीतगेल्या पाच-सहा दिवसांपासून पुराच्या पाण्यामुळे अनेक बंधारे व रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचा सर्वाधिक फटका एसटी विभागाला बसला आहे. मात्र, रविवारी एसटीची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.३९ मार्ग अद्याप पाण्याखालीजिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग १० तर ग्रामीण मार्ग २९ असे ३९ मार्ग पुराच्या पाण्याखाली आहेत. या मार्गावरील वाहतूक अद्याप विस्कळीत आहे.

अद्याप १६४ नागरिक स्थलांतरितचपाऊस उघडला असला तरी इचलकरंजी परिसरातील गावातील ५६ कुटुंबातील १६४ नागरिक व ११६ जनावरे स्थलांतरितच आहेत.

उद्यापासून पुन्हा 'मघा'चा पाऊस, चार दिवस राहणार सक्रियसंथगतीने पडणारा आणि दुसऱ्या तसेच शेवटच्या टप्प्यातील 'मघा' नक्षत्रातील पाऊस उद्या, मंगळवार, दि.२६ ऑगस्ट ते शुक्रवार दि. २९ ऑगस्ट म्हणजे हरतालिका ते ऋषीपंचमी या चार दिवसांत सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून काहीसाच सक्रिय होऊन, मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषतः हा पाऊस कोकणासह सह्याद्रीच्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता, सह्याद्रीच्या कुशीतील जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून नद्या आणि कालवे पात्रात अगोदरच ओव्हरफ्लो होत असलेला पूर-पाणी विसर्ग असाच टिकून राहू शकतो, असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.