शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगडचा इतिहास जातोय विस्मृतीत

By admin | Updated: July 10, 2014 01:01 IST

पावित्र्य जपण्याची गरज : मौजमस्तीचे बनतेय केंद्र

राजाराम कांबळे ल्ल मलकापूरछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि गर्दी, गडबड नसलेला निसर्गरम्य निवांत परिसर म्हणजे विशाळगड. विशाळगडावरील वास्तव्य एक वेगळीच अनुभूती देते. मात्र, हा परिसर वेगळ्याच कारणांनी प्रसिद्धीस येत असल्याने येथील जाज्वल्य इतिहास विस्मृतीत जाऊ लागला आहे.सह्याद्रीच्या मुख्य रांगेत जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर विशाळगड हा किल्ला वसलेला आहे. या गडाचे पूर्वीचे नाव ‘खेळणा’ होते. याची भव्यता आणि दुर्गमता पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे ‘विशाळगड’ असे नामकरण केले. अभेद्य असणाऱ्या या किल्ल्याचे आता बुरूज व तटबंदी ढासळू लागले आहेत. किल्ल्याचे जुने वैभव नष्ट होत आहे. येथील पुराणकालीन मंदिराचीही दुरवस्था झाली आहे. शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला राजवाड्यांच्या भिंतींचा सांगाडा उभा आहे, तर बाजूलाच असलेली शिवकालीन विहीर बुजण्याच्या स्थितीत आहे. येथील नागरिकांनी शिवकालीन भूपाळतळे बुजवून त्यावर अतिक्रमण करून शेती केली आहे. येथील छोटे-मोठे पाण्याचे झरे नागरिकांनी ताब्यात घेऊन अतिक्रमण करून पाणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.विशाळगडाच्या दर्शनी भागी मुंडा दरवाजा भग्नावस्थेत असून, दरवाजाचे दगड निखळू लागले आहेत. दरवाजापुढे सात फुटांवर दरीचा भाग सुरू होतो. दरीकडील बाजूस लोखंडी ग्रील बसवून दरवाजाची डागडुजी करणे गरजेचे आहे. दरवाजावर झाडे-झुडपे उगवली आहेत.गडाच्याभोवती असणारे बुरूज ढासळू लागले आहेत. हे ठिकाण प्रेमीयुगुलांचा अड्डा बनू पाहत आहे. बाजीप्रभू व फुलाजी देशपांडे बंधूंच्या समाधीस्थळाची दुरवस्था झाली आहे. गडावर चढण्यासाठीच्या लोखंडी शिडीचे पाय गंजून तुटले आहेत. यावरून आपला जीव धोक्यात घालून भाविक व पर्यटक गडावर जातात. तेथील पुलाचे बांधकामही रखडले आहे. गडावर शिवकालीन तोफ भग्नावस्थेत आहे. पाण्याची सोय नाही. विश्रामगृह नाही, त्यामुळे खासगी लॉजमध्ये थांबावयास भाग पडते. सर्वत्र अस्वच्छता आहे. दररोज ग्रामपंचायत स्वच्छता करीत नाही. शासकीय जागेत नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे संपूर्ण गडाचे पावित्र्य धोक्यात आहे.गडाच्या विकासासाठी पर्यटन विकास आराखडा शासनाच्या लाल फितीत अडकून आहे. पर्यटन विकास महामंडळाने विचारविनिमय करून गडावर भाविक व पर्यटकांसाठी धर्मशाळा, शौचालय, तसेच धोकादायक ठिकाणी सुरक्षा भिंतीसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. गडावरील मंदिरे, शिवकालीन राजवाडा यांची डागडुजी, मुंडा दरवाजा, बुरुजांची डागडुजी करणे गरजेचे आहे.पर्यटक, भाविक यांना गडाची माहिती होण्यासाठी फलकाची आवश्यकता आहे. गडावर येणाऱ्या पर्यटक व भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी गडावर वणवण भटकावे लागते. यासाठी शासनाने कायमस्वरूपी मोठी पाणी योजना राबविणे गरजेचे आहे.