शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सुत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढवली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. दहावीतील ३० टक्के, अकरावीतील ३० टक्के आणि बारावीतील ...

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. दहावीतील ३० टक्के, अकरावीतील ३० टक्के आणि बारावीतील ४० टक्के अंतर्गत गुणांच्या आधारे सरासरी काढण्याच्या सुत्राव्दारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यातील अकरावीच्या वर्षाला बहुतांश विद्यार्थी हे रेस्ट ईअर मानतात. या वर्षामध्ये बारावीची तयारी करण्यावर भर देतात. त्यामुळे निकालाच्या सुत्राने बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप उडवली आहे. त्यांना गुणांची चिंता लागली आहे.

जिल्ह्यातील एकूण ५२,२९९ विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात सीबीएसईचे ५५०, तर राज्य शिक्षण मंडळाचे (स्टेट बोर्डाचे) ५१,७४९ विद्यार्थी आहेत. राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे जाहीर केले. दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळवले. पुढे बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच वार्षिक परीक्षाही झाली नाही. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे. त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.

पॉईंटर

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी

सीबीएसईचे विद्यार्थी : ५५०

स्टेट बोर्डाचे विद्यार्थी : ५१७४९

प्रतिक्रिया

३० टक्के सूत्रं गणित बिघडवणार

कोरोनामुळे बारावीचा अंतिम निकाल हा दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे जाहीर होणार आहे. अकरावीला बहुतांश विद्यार्थ्यांना कमी गुण असतात. त्याचा बारावीच्या गुणांवर परिणाम होणार आहे. कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा देण्याची आमची तयारी आहे.

- संगीता घाडीगावकर, रूईकर कॉलनी

बारावीमध्ये वर्षभर तयारी करायची असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. आता यावर्षी परीक्षा होणार नाही. बारावीच्या अंतिम मूल्यांकनामध्ये अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार असल्याने गुणांबाबत थोडी चिंता वाटत आहे.

- तेजस पोवार, वळीवडे

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा

बारावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी मिळणाऱ्या गुणांचा अधिक विचार करू नये. यापुढे त्यांना काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यातील चांगल्या यशासाठी अभ्यासावर फोकस ठेवावा.

- डॉ. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल.

दहावी, अकरावीतील गुण हे बेस्ट ऑफ थ्री सुत्रानुसार मिळणार आहेत. त्यामुळे शक्यतो विद्यार्थ्यांना कमी गुण मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी यापुढील परीक्षा आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ची शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य वाढवावीत.

- मुकुंद कांबळे, शिक्षक, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय.

फोटो (१८०७२०२१-कोल-संगीता घाडीगावकर (एचएससी), तेजस पोवार (एचएससी), सरदार जाधव (प्राचार्य), मुकुंद कांबळे (शिक्षक)